“निवडणुकीच्या तोंडावर नवीन आयुक्त नियुक्त करणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही” काँग्रेस खासदाराने स्पष्टचं सांगितलं

नवी दिल्ली – एका निवडणूक आयुक्तांनी राजीनामा दिल्यानंतर निवडणूक आयोगात तीन पैकी दोन जागा आता रिक्त झाल्या आहेत, पण ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तेथे नवीन आयुक्त नियुक्त करणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही असे कॉंग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे.
खासदार कार्ती चिदंबरम म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी १५ मार्च रोजी नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यासाठी बैठक घेणार आहेत. “निवडणुकीच्या वेळापत्रकाच्या घोषणेसाठी काही दिवस शिल्लक असताना, निवडणूक आयुक्त गोयल यांनी राजीनामा दिला आहे आणि आता आमच्याकडे फक्त एक मुख्य निवडणूक आयुक्त आहे.
हे अतिशय दुःखद आहे. १५ तारखेला पंतप्रधान मोदी पुढील निवडणूक आयुक्त निवडण्यासाठी बैठकीचे घेतील. कायद्यानुसार ते योग्य असले तरी पण नैतिकदृष्ट्या ते योग्य नाही. येशूलाही कायद्यानुसार वधस्तंभावर खिळले होते पण नैतिकदृष्ट्या ते योग्य नव्हते असे कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे.





