Amruta Fadnavis : देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार? अमृता फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं; विद्यार्थी आंदोलनावर म्हणाल्या…
Amruta Fadnavis : दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यी आंदोलनावर देखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केले.

Amruta Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भाजपचे केंद्रीय नेतृत्व लवकरच दिल्लीत बोलावून केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देणार, अशा चर्चांना सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पंढरपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना अमृता फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या “नाही, आम्हाला आणि मला महाराष्ट्रातच राहायचे आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार.” असे त्यांनी म्हटलं आहे. (Amruta Fadnavis)
दिल्लीत सुरू असलेल्या विद्यार्थ्यी आंदोलनावर देखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केले.”जोपर्यंत आंदोलन विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि पेपरफुटीविरोधात आहे, तोपर्यंत ते योग्यच आहे. सरकार या प्रकरणात पडद्यामागे काम करत होते आणि आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. फास्ट ट्रॅक कोर्ट, कठोर शिक्षा आणि आवश्यक कायदेशीर बदल केले जात आहेत. विद्यार्थ्यांची मेहनत वाया जाऊ नये आणि त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत
आहे.”
आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांचा निषेध (Amruta Fadnavis)
२० जुलै या दिवशी आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठा संघर्ष झाला. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला. या कारवाईचा सर्वच स्तरातून तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनादरम्यान घडलेल्या हिंसक घटनांचाही अमृता फडणवीस यांनी देखील निषेध केला. “पोलिसांवर आणि काही विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आहे. आंदोलनातील मुलींशी कुठेही गैरवर्तन झाले असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे”, असे त्या म्हणाल्या.
ठाकरे बंधूंच्या मोर्चावर भाष्य (Amruta Fadnavis)
विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ठाकरे बंधूंनी पाठिंबा दिला असून, रविवारी २६ जुलै रोजी मुंबईत आंदोलन पुकारण्यात आले आहे. उबाठा आणि मनसे हे दोन्ही पक्ष एकत्रित मुंबईत मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसने देखील पाठिंबा दर्शवला आहे. या मोर्चावर भाष्य करताना अमृता फडणवीस म्हणाल्या “ते एकत्र येऊन काही करत आहेत, हे चांगलं आहे. इतके दिवस ते वेगळे होते. ती गोष्ट सकारात्मक पद्धतीने घेतली पाहिजे.”
मोदीजी हा नवा अध्याय लिहत आहेत (Amruta Fadnavis)
“देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या देशाच्या तरुणाईसाठी एक नवीन अध्याय सुरु केला आहे. या तरुणाईला दिशा द्यायला आशा आकांक्षा पूर्ण करायला. मोदीजी हा नवा अध्याय लिहत आहेत. त्यातही पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा,” अशी प्रार्थना मी विठुरायाच्या चरणी करतो, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शेतकऱ्यांना दिलास मिळावा
तसेच आषाढीची पूजा ही खरीपाच्या हंगामात होते. खरीपाचा हंगाम चांगला झाला तर शेतकरी सुखी होतो, राज्य सुखी होते. राज्यात चांगला पाऊस व्हावा, शेतकऱ्यांना दिलास मिळावा, आनंद यावा शेतकऱ्यांच्या जीवनात ही माझी विठुरायाच्या चरणी प्रार्थना आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
Pune District : भोर ते निगुडघर मार्गावर चालकांचा जीवघेणा प्रवास





