India Warmup Bowling : श्रीलंकेत उतरताच भारतीय गोलंदाजांची पोलखोल! सराव सामन्यातच धुलाई; गौतम गंभीरची चिंता वाढली
India Warmup Bowling : नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, श्रीलंका इलेव्हन संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८ बाद ३६३ धावा केल्या आहेत.

India Warmup Bowling IN IND vs SL XI Warm Up Match Colombo Day 1 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेपूर्वी खेळल्या जात असलेल्या तीन दिवसीय सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघासाठी चिंतेची बाब समोर आली आहे. कोलंबो येथे सुरु असलेल्या या वॉर्म-अप सामन्यात ‘श्रीलंका इलेव्हन’च्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची पार धुळधाण उडवत पहिल्या दिवशी ८ बाद ३६३ धावांचा डोंगर उभारला. नियमित कर्णधार शुबमन गिल दुखापतीमुळे बाहेर असल्याने या सामन्यात के. एल. राहुलने भारताचे नेतृत्व केले. मात्र, ७ गोलंदाजांचा वापर करूनही भारतीय गोलंदाज यजमानांना रोखण्यात अपयशी ठरले.
सलामीवीरांची ११० धावांची साकारली तुफानी भागीदारी!
टॉस जिंकून प्रथम फलंदाजीस आलेल्या श्रीलंका ११ संघाला निशान मदुश्का आणि रविंदु रसंथा या जोडीने आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी अवघ्या २०.४ षटकांत ११० धावा जोडल्या. निशान ६६ धावा करून धावबाद झाला. त्यानंतर रविंदुनेही ७१ धावांची दमदार खेळी केली. रवींद्र जडेजाने पसिंदु सूरियाबंडाराला (३५) बाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना फक्त एकच विकेट्स मिळवता आली.
कर्णधार सोनल दिनुशाचे अर्धशतक!
It’s Stumps on Day 1 of the warm-up game!
Ravindra Jadeja. Kuldeep Yadav, Manav Suthar & Gurnoor Brar share the spoils with the ball for #TeamIndia 🙌 🙌
SLC XI end the opening Day at 363/8.
See you tomorrow for Day 2⃣ action!
Scorecard ▶️ https://t.co/g7rdlUUjY2 pic.twitter.com/Fhkiq1pWAY
— BCCI (@BCCI) August 7, 2026
पवन रत्नायके (३९) आणि अहान विक्रमसिंघे (३१) बाद झाल्यानंतर यजमान संघाचा कर्णधार सोनल दिनुशाने सूत्रे हाती घेतली. त्याने ५२ धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. त्याने अंजला बंडारासोबत ३४ तर रमेश मेंडिससोबत ६४ धावांची भागीदारी केली. नव्या चेंडूने रवींद्र जडेजाने मेंडिसला (३२) बाद करत ही जोडी फोडली, तर मानव सुथारने कर्णधार सोनलला बाद केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा केशरा नुवंता (९) आणि दिलुम सुदीरा (१) क्रीजवर होते.
भारताकडून रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर गुरनूर ब्रारला १ विकेट्स मिळाली. मात्र, ५ गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट ४ पेक्षा जास्त राहिल्याने मालिकेआधी टीम इंडियाच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.





