South Africa vs India 2nd Test Day 1 Stumps : केपटाऊनमध्ये पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेनं दिवसअखेर 3 बाद 62 धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे. एडन मार्कराम 36 आणि डेव्हिड बेडिंगहॅम सात धावांसह खेळत आहे. भारताकडे अजूनही 36 धावांची आघाडी असून दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या डावात सात विकेट शिल्लक आहेत. दुसऱ्या डावात भारताकडून मुकेश कुमारने दोन आणि जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. डीन एल्गर 12 धावा करून बाद झाला. टोनी डीजॉर्ज आणि ट्रिस्टन स्टब्स प्रत्येकी एक धाव घेऊन बाद झाले.
An action-packed Day 1 in Cape Town comes to an end 🙌🏻
A total of 2️⃣3️⃣ wickets were claimed on the opening day!
South Africa 62/3 in the second innings, trail by 36 runs.
Scorecard ▶️ https://t.co/PVJRWPfGBE#TeamIndia | #SAvIND pic.twitter.com/7lo71BWms0
— BCCI (@BCCI) January 3, 2024
तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गरने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 55 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात सर्वबाद 153 धावा केल्या आणि 98 धावांची आघाडी घेतली होती.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात काय घडले?
दक्षिण आफ्रिका आणि भारत (SA vs IND) यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे सुरू झाला, ज्याच्या पहिल्या सत्रात असे काही घडले ज्याची दोन्ही संघांना अपेक्षा नव्हती. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु यानंतर फलंदाजीत त्यांची अत्यंत खराब कामगिरी दिसून आली आणि आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला.
IND vs SA 2nd Test Day 1 : सिराजचा विकेटचा षटकार, पहिल्या डावात द. आफ्रिका अवघ्या 55 धावांत गारद…
दक्षिण आफ्रिकेचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. काइल व्हर्नने 15 आणि डेव्हिड बेडिंगहॅमने 12 धावांचे योगदान दिले. याशिवाय एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. एडेन मार्करम (2 धावा), डीन एल्गर (4 धावा), टोनी डी जॉर्जी (2 धावा), ट्रिस्टन स्टब्स (3 धावा), मार्को यानसेन (0 धावा), केशव महाराज (3 धावा), कगिसो रबाडा (5 धावा), नांद्रे बर्गर (4 धावा) हे स्वस्तात बाद झाले.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) 6 विकेट्स घेऊन पहिल्या कसोटीत किल्ल्याप्रमाणे मजबूत दिसणार्या आफ्रिकन फलंदाजीला उद्ध्वस्त करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. या व्यतिरिक्त जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
भारताच्या पहिल्या डावात काय घडले?
आफ्रिकेचा संपूर्ण संघ 23.2 षटकात 55 धावा करून सर्वबाद झाला. त्यानंतर प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 153 धावांवरच आटोपला आहे आणि भारताने 98 धावांची आघाडी घेतली. विशेष म्हणजे दुसऱ्या भारताने शेवटच्या सहा विकेट्स एकही धाव न करता गमावल्या. एकवेळ भारताची धावसंख्या 4 बाद 153 होती. विराट कोहली आणि लोकेश राहुल फलंदाजी करत होते. यावेळी राहुल बाद झाल्याने टीम इंडियाला पुढे एकही धाव करता आली नाही आणि 153 धावांवरच भारताचा डाव आटोपला.
भारताचे तीनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. कर्णधार रोहितने 39 धावांची खेळी खेळली. शुभमन गिलने 36 आणि विराट कोहलीने सर्वाधिक 46 धावा केल्या. या तिघांव्यतिरिक्त फक्त लोकेश राहुलला खाते उघडता आले. त्याने आठ धावा केल्या. यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा आणि मुकेश कुमार यांना खाते उघडता आले नाही. मात्र, मुकेशला एकाही चेंडूचा सामना करावा लागला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी आणि नांद्रे बर्जर यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.