Maharashtra Politics : राजकीय भूकंप! भाजपच्या शेकडो पदाधिकाऱ्यांसह नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश; कल्याण-डोंबिवलीत मोठे राजकीय नाट्य
Maharashtra Politics : मराठी भाषेच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारणात मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळत आहे.

Maharashtra Politics : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून कल्याण-डोंबिवलीतील राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पक्षातील नाराजी उफाळून आल्याचं चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि माजी आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय दुर्गेश बागुल यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. (Maharashtra Politics)
श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
डोंबिवलीतील जोंधळे हॉलमध्ये खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे आणि संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या उपस्थितीत बागुल यांचा पक्षप्रवेश झाला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बागुल यांच्या या पक्षांतरामुळे कल्याण-डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का बसल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Politics)
नंदू परबांच्या वक्तव्यावरून नाराजी
भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका करताना उत्तर भारतीय नेत्याचा दाखला दिला होता. त्यांच्या या भूमिकेवर दुर्गेश बागुल यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. (Maharashtra Politics)
“राज ठाकरेंवर टीका करा, मात्र परप्रांतीय नेत्यांचा आधार घेऊन मराठी अस्मितेला कमी लेखू नका,” अशी भूमिका बागुल यांनी घेतली. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (Maharashtra Politics)
‘माफी १५ कोटी मराठी जनतेची मागा’
नंदू परब यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, मात्र ही माफी केवळ माझी नसून १५ कोटी मराठी जनतेची मागावी, अशी मागणी बागुल यांनी केली. मराठी भाषा आणि मराठी अस्मितेचा मुद्दा हा केवळ राजकीय नसून तो भावनेशी जोडलेला असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (Maharashtra Politics)
भाजपमधील गटबाजीचा आरोप
भाजपमध्ये नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि पक्षांतर्गत गटबाजी असल्याचा आरोप करत बागुल यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. विशेषतः मराठी भाषेच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका मान्य नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शेकडो कार्यकर्त्यांसह झालेला हा पक्षप्रवेश आगामी काळात कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय समीकरणांवर कितपत परिणाम करतो, याकडे आता लक्ष लागलं आहे. (Maharashtra Politics)






