Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का! विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द? जात प्रमाणपत्र समितीचा निर्णय
Maharashtra Politics : मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी नगरसेविका विशाखा राऊत यांच्याबाबत एक मोठी राजकीय आणि प्रशासकीय घडामोड समोर आली आहे.

Maharashtra Politics : मुंबई महापालिकेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने त्यांचे जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राऊत यांच्या नगरसेवकपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विशाखा राऊत या मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक १९१ मधून नगरसेविका आहेत. त्यांच्या कुणबी जात वैधता प्रमाणपत्राच्या पडताळणीदरम्यान सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांवर समितीने आक्षेप घेतला. संबंधित प्रमाणपत्र देण्यासाठी पालघरचे उपविभागीय अधिकारी सक्षम नसल्याचे समितीच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, राऊत यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमधून कुणबी जात वैधता प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तींशी त्यांचा रक्तनातेसंबंध सिद्ध झालेला नसल्याचेही समितीने म्हटले आहे. त्यामुळे १९ डिसेंबर २०२५ रोजी देण्यात आलेले जात प्रमाणपत्र रद्द करण्यात आले असून, ते १५ दिवसांच्या आत समितीकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Maharashtra Politics)
विशाखा राऊत यांचा गंभीर आरोप
या कारवाईनंतर विशाखा राऊत यांनी आपल्याकडे आजोबांच्या काळापासूनचे जातीसंदर्भातील पुरावे असल्याचा दावा केला आहे. तसेच जात पडताळणीसाठी आपल्याकडे पुढील कायदेशीर प्रक्रिया करण्यासाठी अवधी असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, एकनाथ शिंदे यांच्या गटातील नगरसेवकांनी दबाव आणल्यामुळे आपल्यावर ही कारवाई झाल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे. (Maharashtra Politics)

अंतिम निर्णय अद्याप बाकी?
महत्त्वाचे म्हणजे जात प्रमाणपत्र समितीचा निर्णय झाल्यानंतरही नगरसेवकपदाच्या बाबतीत पुढील कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया होणे बाकी आहे. त्यामुळे विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद तात्काळ अंतिमरित्या संपुष्टात आले आहे, असे सरसकट म्हणणे योग्य ठरणार नाही. (Maharashtra Politics)
समितीच्या आदेशाविरोधात विभागीय आयुक्त, कोकण विभाग यांच्यासमोर ९० दिवसांच्या आत अपील करण्याची तरतूद आहे. त्यामुळे राऊत या निर्णयाला आव्हान देणार असल्याची माहिती आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील ठाकरे गटाच्या राजकारणातही चर्चेला उधाण आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics)
Maharashtra Politics : शिंदेच टेन्शन वाढलं ! 6 खासदारांच्या बंडखोरीबाबत सुप्रीम कोर्टाचं मोठं पाऊल





