Harmanpreet Kaur Record : हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक धमाका! टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारी बनली जगातील तिसरीच फलंदाज
Harmanpreet Kaur Record : रमनप्रीतने महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ४,००० धावा पूर्ण केल्या असून, असा पराक्रम करणारी ती जगातील केवळ तिसरी फलंदाज ठरली आहे.

Harmanpreet Kaur 4000 T20I Runs Record : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. हरमनप्रीतने महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या ४,००० धावा पूर्ण केल्या असून, असा पराक्रम करणारी ती जगातील केवळ तिसरी फलंदाज ठरली आहे. तिच्यापूर्वी हा महाविक्रम न्यूझीलंडची सुझी बेट्स आणि भारताचीच धडाकेबाज सलामीवीर स्मृती मानधना यांनी केला आहे. हरमनप्रीतने आपल्या टी-२० कारकिर्दीतील १९६ व्या सामन्यात हा खास टप्पा गाठला.
महिला टी२० मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची यादी:
महिला टी-२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीतही आता हरमनप्रीत तिसऱ्या स्थानावर मजबूत स्थितीत आहे. सध्या ती ४,०१९ धावांवर आहे.
- सुझी बेट्स (न्यूझीलंड): ४,७२० धावा (१८३ सामने)
- स्मृती मानधना (भारत): ४,३१३ धावा (१६५ सामने)
- हरमनप्रीत कौर (भारत): ४,०१९ धावा (१९६ सामने)
- चामरी अटापट्टू (श्रीलंका): ३,७५२ धावा
- सोफी डिव्हाइन (न्यूझीलंड): ३,७१९ धावा
पहिल्या सामन्यात विश्रांतीनंतर दुसऱ्या सामन्यात पुनरागमन –
An incredible player joins an elite club ✨#TeamIndia Captain Harmanpreet Kaur becomes just the 2️⃣nd Indian and 3️⃣rd player overall to amass 4️⃣0️⃣0️⃣0️⃣ T20I runs 👏🫡
Updates ▶️ https://t.co/qaQTNLMyMq#ENGvIND | @ImHarmanpreet pic.twitter.com/saG1mfnQj0
— BCCI Women (@BCCIWomen) May 30, 2026
या मालिकेतील पहिल्या टी-२० सामन्यात बीसीसीआयने हरमनप्रीत कौरला विश्रांती दिली होती. तिच्या अनुपस्थितीत उपकर्णधार स्मृती मानधनाने संघाचे नेतृत्व केले होते. दुसऱ्या टी-२० सामन्यात कर्णधार म्हणून पुनरागमन करत हरमनप्रीतने २८ धावांची खेळी नक्कीच केली, परंतु ती आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. यापूर्वी झालेल्या मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात भारतीय महिला संघाने ३८ धावांनी शानदार विजय नोंदवला होता.
दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा पराभव; मालिका १-१ ने बरोबरीत!
दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने २० षटकांत ५ विकेट्स गमावून १६८ धावांचा मजबूत डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेला भारतीय संघ २० षटकांत ९ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ १४२ धावाच करू शकला आणि भारताला २६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तीन सामन्यांची ही टी२० मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आता मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना २ जून रोजी ‘कूपर असोसिएट्स काउंटी ग्राउंड, टॉन्टन’ येथे खेळवला जाईल.





