Devendra Fadnavis : मराठा आरक्षणावरून सरकारला घेराव! CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले “पुढील काळात…”

Devendra Fadnavis : राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा समाजाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी थेट राजधानी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनला सुरूवात केली आहे. त्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील गावागावातून मोठा पाठिंबा मिळताना दिसत आहे. आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव दाखल झाले आहेत.
आता गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय मागे हटणार नसल्याचा पक्का निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या आंदोलनला महायुतीमधील काही आमदार आणि खासदार यांनी पाठिंबा दिल्याची माहिती आहे. अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली असून, मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण सुरू आहे, असा गंभीर आरोप करत यामुळे याचा फायदा न होता नुकसानच होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
जरांगे यांनी मराठा समाजाच्या लढ्याला पुन्हा एकदा सुरुवात केली असून आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे. त्यांच्या आंदोलनाला काही राजकीय नेत्यांनीही पाठिंबा दर्शवला असल्याची माहिती आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले आजही आंदोलनाला करता सोयी सुविधा देणारे कोण आहे, हे पाहायला मिळतेय. पण ठिकाय, आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही. आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू.
पुढच्या काळात मराठा समाजाला….





