Maharashtra Rainfall Update : ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा जोर वाढणार…! मुंबईसह या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Maharashtra Rainfall Update : राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय होताना पाहायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, बुधवारी रात्री पुन्हा शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ६ जुलैपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतील अनेक भागांतही बुधवारी रात्रीपासून पाऊस सुरु आहे. पुणे आणि कोकणात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सोशल मीडियावर दिलेल्या माहितीनुसार, ६ जुलैपासून महाराष्ट्रातील कोकण व घाट भागात पाऊस चांगला सक्रीय होणार आहे.
या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
विदर्भ व मराठवाडा काही भागात पावसाचे प्रमाण वाढणार असून, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांत ३ ते ६ या कलावधीमध्ये मुसळधार ते अतिमुसधार पावसाचा इशार देण्यात आला आहे. याशिवाय कोकणातील रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही चांगला पाऊस होणार
पश्चिम महाराष्ट्रातही चांगल्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार पुणे, पुणे घाटमाथा, कोल्हापूर, सातारा, या भागांतही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे.
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला
बुधवारी रात्री पुण्यात चांगला पाऊस झाला आहे. तसेच घाटमाथ्यावर जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. बुधवारी रात्री १२ वाजता 6451 क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी जास्त केला जाणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले आहे.
हेही वाचा : घानाला जाताच पंतप्रधान मोदींची ‘या’ दुर्मिळ खजिन्यासाठी मोठी डील ; चीनचा झाला संताप





