घानाला जाताच पंतप्रधान मोदींची ‘या’ दुर्मिळ खजिन्यासाठी मोठी डील ; चीनचा झाला संताप

PM Modi Ghana Visit। पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात घानाला पोहोचले. त्यांनी घानाला पोहोचून अनेक ऐतिहासिक करारांवर स्वाक्षरी केली, त्यापैकी सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुर्मिळ पृथ्वी खनिजांच्या खाणकामाशी संबंधित होते. पंतप्रधान मोदी आणि घानाचे अध्यक्ष जॉन ड्रामानी महामा यांच्यात झालेल्या व्यापक चर्चेनंतर, दोन्ही देशांनी अनेक करारांवरही चर्चा केली.
पंतप्रधान मोदी यांनी एका निवेदनात, दोन्ही बाजूंनी पुढील पाच वर्षांत द्विमार्गी व्यापार दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवले आहे आणि भारत केवळ एक भागीदारच नाही तर घानाच्या विकास प्रवासात सह-प्रवासी देखील आहे.” असे म्हटले आहे. मोदी पश्चिम आफ्रिकन देशाच्या राजधानीत पोहोचल्यानंतर काही तासांत दोन्ही नेत्यांमधील प्रतिनिधीमंडळ पातळीवरील बैठक झाली. मोदी त्यांच्या पाच देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात घानाला पोहोचले आहेत.
भारत-घाना भागीदारीमुळे चीनला योग्य उत्तर PM Modi Ghana Visit।
चीनकडे दुर्मिळ पृथ्वी खनिजे भरपूर आहेत, परंतु त्यांनी त्यावर पूर्ण नियंत्रण ठेवले आहे. यामुळे भारताच्या इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) प्रकल्पाला नुकसान झाले आहे. आता भारताने घानासोबत दुर्मिळ पृथ्वी खनिजांबाबत करार करून चीनला योग्य उत्तर दिले आहे. भारताने चीनची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. दरम्यान , या करारामुळे चीनचा संताप झाला असल्याचे दिसून येत आहे.
I thank the people and Government of Ghana for conferring ‘The Officer of the Order of the Star of Ghana’ upon me. This honour is dedicated to the bright future of our youth, their aspirations, our rich cultural diversity and the historical ties between India and Ghana.
This… pic.twitter.com/coqwU04RZi
— Narendra Modi (@narendramodi) July 2, 2025
मोदींनी दहशतवादाबद्दल काय म्हटले ? PM Modi Ghana Visit।
संस्कृती आणि पारंपारिक औषधांसह अनेक क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी चार करारांवर स्वाक्षरी केली. महामा यांच्या उपस्थितीत पंतप्रधान मोदी म्हणाले, “राष्ट्रपती महामा आणि मी द्विपक्षीय संबंधांना व्यापक भागीदारीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.” पंतप्रधान म्हणाले की, दहशतवाद हा मानवतेचा शत्रू आहे यावर दोन्ही बाजू एकमत आहेत आणि या धोक्याला तोंड देण्यासाठी परस्पर सहकार्य आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेण्यात आला. मोदी म्हणाले, “दहशतवादाविरुद्धच्या भारताच्या लढाईत घानाच्या सहकार्याबद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त केली.”





