छत्रपती संभाजीनगर – प्रभु श्री रामांनी सरकारला सबुद्धी द्यावी, हीच आमची श्री रामांच्या चरणी प्रार्थना आहे. केंद्रापासून ते राज्यापर्यंत सर्वांना सद्बुद्धी द्यावी. मराठा समाजाला 20 तारखेच्या आत आम्हाला आरक्षण दिल्यास सर्व मराठा समाज हा अयोध्येला दर्शनासाठी जातील, असे मनोज जरांगे-पाटील म्हणाले.
मराठा समाज आरक्षणासाठी 20 जानेवारीला मुंबईच्या दिशेने पायी दिंडी निघणार आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, देव हा मनात असायला हवा. सर्वसामान्य शेतकरी हे शेतातून राम-राम म्हणतो. जेव्हा शेतकरी एकमेकांना भेटतात, तेव्हा ते राम-राम म्हणतो. राम मंदिराचे काम अर्धवट झाले असताना सुद्धा तुम्ही 22 जानेवारीची तारीख निवडली. यासंदर्भात कोणाला शंका उपस्थित होत नाही.
श्री रामावर तुमच्यापेक्षा आमची जास्त आस्था आहे. 20 जानेरवारीला सर्व मराठा समाज पायी दिंडी काढत मुंबईच्या दिशेने आगेकचू करणार आहेत. आम्हाला 22तारखेला सगळेजण राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. याचा आम्हाला आनंद आहे आणि त्या आनंदात आम्ही देखील सहभागी होणार आहोत. गेल्या चार महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे.
आम्ही सर्व मराठे हे छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रभू श्रीराम यांचे विचार घेऊन मराठे मुंबईकडे निघणार आहोत. हे सर्वांना मान्य आहे, असे काही जोडू नका. मुंबईच्या दिशेने मराठे शांतपणे येणार असून शांतपणे परत जाणार आहे. एक जरी वाहन अडवले तरी मराठे नागपूर, बारामती आणि मुंबई या ठिकाणी जाऊन तिघांच्याही दारात जाऊन बसतील, असा इशाराही त्यांनी दिला.