मुंबई – राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.
राज्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विस्कळीत झालेले जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था तसेच, सदर परस्थिती पूर्वपदावर येण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवता यावा यासाठी, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 कक मधील तरतूदीनुसार शासनास प्राप्त झालेल्या अधिकारात, 250 ककवा त्यापेक्षा कमी सदस्य संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच, ज्याप्रकरणी सर्वोच्च/ उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशीत केले आहे, अशा सहकारी सांस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर 30 सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत, असं सहकार विभागाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका या आदेशान्वये पुढे ढकलण्यात आलेल्या नाहीत. त्यांच्या निवडणुका शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोर पालन करुन निवडणुका घेण्याबाबत कार्यवाही करावी, असेदेखील सहकार विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
विक्रमसिंघे यांनी घेतली कार्यवाहक राष्ट्रपतीपदाची शपथ; राष्ट्रपती राजपक्षेंचा राजीनामा मंजूर
दरम्यान, राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून, नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेला 92 नगरपालिका, 4 नगर पंचायती आणि 15 ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलला आहे. या पार्श्वभूमीवर सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून घेण्यात येणाऱ्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या निवडणुका 30 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या असून नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
“सप”च्या नेतृत्वाखालील आघाडीला तडे; एनडीएबाहेरील आणखी एका पक्षाचा मुर्मू यांना पाठिंबा