कोलंबो – श्रीलंकेत आलेल्या आर्थिक संकटानंतर देशात आणीबाणी लागू करण्यात आली. या बिकट परिस्थितीत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोतबाया राजपक्षे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कोलंबोच्या रस्त्यांवर लोकांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. दुसरीकडे, आंदोलकांनी ताब्यात घेतलेल्या महत्त्वाच्या सरकारी इमारतींमधूनही माघार घेण्यास सुरुवात केली आहे.
श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा थापा अभयवर्धने यांनी सांगितले की, गोतबाया राजपक्षे यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला आहे. कायदेशीर प्रक्रिया अवलंबली जात आहे. नवीन राष्ट्रपती निवडून येईपर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे काळजीवाहू अध्यक्ष म्हणून काम पाहतील, असे ते म्हणाले. नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी खासदारांना बोलावण्यात आले आहे.
गोतबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाचा राजीनामा ई- मेलद्वारे श्रीलंकेतील संसदेच्या अध्यक्षांना पाठवला होता. गोतबाया राजपक्षे यांनी बुधवारी देश सोडून मालदीवला गेले. तेथे एक दिवसाचा मुक्काम केल्यानंतर ते सिंगापूरला पोहोचले. सिंगापूर सरकारने गोतबाया राजपक्षे हे खासगी भेटीसाठी आल्याचे म्हटले आहे. सिंगापूर सरकारने म्हटले आहे की, गोतबाया यांनी आमच्याकडे आश्रय मागितला नाही. आम्हीही त्यांना आश्रय दिला नाही.
चीनच्या आक्रमकतेला तोंड देण्यासाठी अमेरिकेचे भारताला बळ; एस-400 क्षेपणास्त्र खरेदीचा मार्ग मोकळा
दरम्यान, श्रीलंकेच्या लष्कराने आंदोलकांना सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे राहण्याचे आवाहन केले आहे. सशस्त्र दलाच्या सदस्यांना मानवी जीवनास धोका, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाल्यास बळ वापरण्याची कायदेशीर परवानगी देण्यात आली आहे.
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते ‘दुनागिरी’ युद्धनौकेचे जलावतरण