D. K. Shivakumar : कर्नाटकात वंदे मातरमची दोनच कडवी गाणार; मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा मोठा निर्णय
कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी वंदे मातरमबाबत एक निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार 'वंदे मातरम'चे फक्त पहिली दोनच कडवी गाण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचे पालन करेल.

D. K. Shivakumar : कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी वंदे मातरमबाबत एक निर्णय घेतला. त्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार ‘वंदे मातरम’चे फक्त पहिली दोनच कडवी गाण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचे पालन करेल. त्यांनी पक्षाच्या भूमिकेचे समर्थन केले. कर्नाटकातील स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात संपूर्ण सहा श्लोक गाण्याची कल्पना फेटाळून लावत शिवकुमार म्हणाले की, हा निर्णय त्यांच्या माहितीशिवाय घेण्यात आला होता.
स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यात राष्ट्रगीत पूर्णपणे न गायल्याबद्दल नंतर आपली प्रतिक्रिया देताना शिवकुमार (D. K. Shivakumar) म्हणाले, मी माझ्या पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवतो. आम्ही जो काही निर्णय घेतला आहे, त्यावर मी ठाम आहे. हे माझ्या माहितीशिवाय किंवा राजभवनात घडले असेल, पण भविष्यात आणि कोणत्याही सरकारी कार्यक्रमात, आम्ही पूर्वी ठरवलेल्या निर्णयावर ठाम राहू.
भारतीय राजकारणातील तुष्टीकरणाच्या राजकारणावर भाष्य करताना शिवकुमार म्हणाले की, काँग्रेस विविधतेवर विश्वास ठेवते. त्यांनी भाजपवर तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोपही केला. मात्र, संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सर्व शासकीय कार्यक्रमांत वंदे मातरमची पाचही कडवी गाण्याबाबतचा कायदा बनला आहे. हे राष्ट्रीय गीत असून वंदे मातरम पूर्णपणे न गायल्यास भारतीय ध्वजसंहितेचा अवमान होऊ शकतो.
भाजप काय म्हणाले?
भाजप नेते गौरव वल्लभ यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर म्हणाले, ज्यांनी संविधानाचे रक्षण करण्याची शपथ घेतली आहे, ते राष्ट्रगीत गाणार नाहीत असे म्हणतात. शिवकुमार, तुम्ही संविधानाची शपथ घेतली आहे. जेव्हा तुम्ही राष्ट्रगीताचा अपमान करता, तेव्हा तुम्ही भारताच्या संविधानाचा अपमान करता. तुम्ही हे सर्व एका विशिष्ट धार्मिक समुदायाला खूश करण्यासाठी करत आहात.
देशातील जनता तुमच्याकडे पाहत आहे. जर घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने संविधानाचा (D. K. Shivakumar) अपमान केला, तर तुम्हाला आणि तुमच्या पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये, कर्नाटक आणि सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठी किंमत मोजावी लागेल. या देशात राष्ट्रगीताचा अपमान सहन केला जाणार नाही आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.






