Congress Reshuffle : काँग्रेसमध्ये मोठी संघटनात्मक फेरबदल; संजय दत्त यांच्याकडे मोठी जबाबदारी
Congress Reshuffle : आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पक्ष संघटनेत अत्यंत महत्त्वाचे आणि मोठे फेरबदल केले आहेत.

Congress Reshuffle : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत महत्त्वाचे बदल केले आहेत. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या मंजुरीनंतर उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओडिशा या राज्यांसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नव्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आल्याचे पक्षाच्या अधिकृत पत्रकात म्हटले आहे. (Congress Reshuffle)
नव्या नियुक्त्यांनुसार राजेंद्र पाल गौतम यांच्याकडे उत्तर प्रदेश, लालजी देसाई यांच्याकडे ओडिशा आणि संजय दत्त यांच्याकडे हरयाणाचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. या नियुक्त्या तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. (Congress Reshuffle)
मावळत्या प्रभारींच्या कामाचे कौतुक
काँग्रेसने यावेळी उत्तर प्रदेशचे मावळते प्रभारी अविनाश पांडे यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले आहे. तसेच बी. के. हरिप्रसाद आणि अजय कुमार लल्लू यांनी पक्ष संघटनेसाठी दिलेल्या योगदानाचाही गौरव करण्यात आला आहे. (Congress Reshuffle)
राजेंद्र पाल गौतम यांची नियुक्ती का महत्त्वाची?
उत्तर प्रदेशात काँग्रेसने राजेंद्र पाल गौतम यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. ते दिल्ली सरकारमध्ये मंत्री राहिले असून सध्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आहेत. उत्तर प्रदेशातील दलित आणि मागासवर्गीय मतदारांमध्ये पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी काँग्रेसने ही रणनीतिक नियुक्ती केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. (Congress Reshuffle)
उत्तर प्रदेशात काँग्रेसला गेल्या काही वर्षांपासून संघटनात्मक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून पक्षाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न या नियुक्तीमागे असल्याचे मानले जात आहे. (Congress Reshuffle)
हरयाणा आणि ओडिशातही नवी रणनीती
हरयाणात संजय दत्त आणि ओडिशात लालजी देसाई यांची नियुक्ती करून काँग्रेसने संघटन विस्ताराला प्राधान्य दिल्याचे दिसून येते. आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी या राज्यांमध्ये पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याची जबाबदारी नव्या प्रभारींवर असेल. (Congress Reshuffle)
आता लक्ष निवडणूक तयारीकडे
काँग्रेसकडून करण्यात आलेल्या या फेरबदलांचा मुख्य उद्देश निवडणूक तयारीला वेग देणे आणि राज्यनिहाय संघटना अधिक सक्रिय करणे हा असल्याचे मानले जात आहे. उत्तर प्रदेश, हरयाणा आणि ओडिशातील नव्या प्रभारींच्या कामगिरीचा आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला किती फायदा होतो, याकडे आता राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे. (Congress Reshuffle)






