Rahul Gandhi : टेलिग्राम बंदी हा उपाय नाही.! ‘विद्यार्थ्यांवर नाही, माफियांवर करवाई करा’; राहुल गांधींची टीका
Rahul Gandhi : केंद्र सरकारने टेलिग्राम ॲपवर तात्पुरती बंदी घातल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. ही नवी चाल म्हणजे चोराला पकडण्याऐवजी पीडिताच्याच घराला कुलूप लावण्यासारखे आहे.

Rahul Gandhi – केंद्र सरकारने टेलिग्राम (Telegram) ॲपवर तात्पुरती बंदी घातल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र निशाणा साधला आहे. ही नवी चाल म्हणजे चोराला पकडण्याऐवजी पीडिताच्याच घराला कुलूप लावण्यासारखे आहे, अशी खरपूस टीका त्यांनी केली.
२१ जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर, कॉपी करणाऱ्या टोळ्या आणि अफवांना आळा घालण्यासाठी सरकारने २२ जूनपर्यंत टेलिग्रामवर निर्बंध लादले असून गुगल आणि ॲपल स्टोअरवरूनही हे ॲप हटवले आहे.
केंद्राच्या या निर्णयावर संताप व्यक्त करताना सोशल मिडिया पोस्टमध्ये खासदार राहुल गांधी म्हणाले की, लाखो विद्यार्थी अनेक वर्षांपासून नोट्स, टेस्ट सिरीज आणि अभ्यासाच्या चर्चेसाठी टेलिग्रामचा वापर करत आहेत. (Rahul Gandhi)
ती सुविधा हिरावून घेणे हा पेपर लीकवरील उपाय कसा असू शकतो? परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांची अंगझडती घेणे, खिसे कापणे आणि हवाई दलाद्वारे प्रश्नपत्रिका पाठवणे अशा नाटकांची काहीच कमतरता नसेल, पण समस्येच्या मुळाशी मात्र प्रहार केला जाणार नाही. (Rahul Gandhi )
कारण याच सरकारच्या देखरेखीखाली पेपर लीक करणारा माफिया फोफावत आहे. मोदीजी, ही नाटकं थांबवा आणि विद्यार्थ्यांऐवजी माफियावर प्रहार करा, असे आवाहन देखील राहुल यांनी केले. (Rahul Gandhi )
सीईओ डुरोव्ह यांचा आक्षेप

Rahul Gandhi : टेलिग्राम बंदी हा उपाय नाही.! ‘विद्यार्थ्यांवर नाही, माफियांवर करवाई करा’; राहुल गांधींची टीका
टेलिग्रामचे (Telegram) मुख्य कार्यकारी अधिकारी पावेल डुरोव्ह यांनीही या बंदीवर कडक शब्दांत आक्षेप घेतला आहे. भारताच्या आयटी मंत्रालयाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगत ते म्हणाले की, काही वापरकर्त्यांनी परीक्षेचे लीक झालेले प्रश्न शेअर केले म्हणून भारतातील १५ कोटींहून अधिक सामान्य वापरकर्त्यांना शिक्षा दिली जात आहे.
या बंदीमुळे काहीही साध्य झालेले नाही, कारण लीक झालेली माहिती आता केवळ इतर ॲप्सवर स्थलांतरित झाली आहे, असे डुरोव्ह यांनी स्पष्ट केले.





