बल्लारी – राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो ( Bharat Jodo ) यात्रेचा एक हजार किमीचा टप्पा आज पुर्ण झाला. एकूण ही यात्रा सुमारे साडे तीन हजार किमीची आहे. या दिवसाचा आनंद साजरा करण्यासाठी कॉंग्रेसचे अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे शनिवारी या जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये राहुल गांधी आणि इतर नेत्यांसोबत सामील झाले. सध्या ही यात्रा कर्नाटकात आहे.
भारत जोडो यात्रेवर भाजपचा निशाणा; म्हणाले, “ही तर काँग्रेस नेतृत्वाला….”
मल्लिकार्जून खर्गे हेही याच राज्याचे आहेत. त्यांनी यावेळी प्रथमच यात्रेत आपली उपस्थिती लावली. भारत जोडो ( Bharat Jodo ) यात्रा 30 सप्टेंबर रोजी कर्नाटकात दाखल झाली आणि 21 दिवसांत 511 किमी अंतर कापून 20 ऑक्टोबर रोजी या राज्यातून ही यात्रा पुढील राज्याकडे मार्गस्थ होईल. यात्रेच्या या एक हजार किमीच्या टप्प्याच्या निमीत्ताने बल्लारीत सभाही आयोजित करण्यात आली होती. या यात्रेला कर्नाटकात अभुतपुर्व प्रतिसाद मिळाला.