“लोकांनी त्यांना तोपर्यंत गांभीर्याने…” ; चंद्राबाबुंचे पुत्र नारा लोकेश यांचे राहुल गांधींबद्दल महत्वाचे विधान

Nara Lokesh on Rahul Gandhi। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे पुत्र आणि कॅबिनेट मंत्री नारा लोकेश यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे कौतुक केले आहे. नारा लोकेश यांनी,”भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींची राजकीय समज खूप विकसित झाली आहे. असा मोठा दावा केला आहे. तसेच राहुल गांधी यांना भारतीय राजकारणातील बारकावे आणि प्रत्येक राज्यातील विविधता समजत आहे कारण भारत खूप गुंतागुंतीचा आहे” असे महत्वाचे विधान देखील त्यांनी केले आहे.
नारा लोकेश यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत हे विधान केले आहे. त्यांनी याविषयी बोलताना, “भारत जोडो यात्रेच्या पहिल्या टप्प्यानंतर लोकांनी राहुल गांधींना गांभीर्याने घेतले.” असे म्हटले. लोकेश यांना विचारण्यात आले की, त्यांना स्वतःमध्ये आणि राहुल गांधींमध्ये काही साम्य दिसते का. यावर ते म्हणाले की नाही, “मला असे वाटत नाही. आम्ही दोघेही पूर्णपणे वेगळे आहोत. आमचे मार्ग वेगळे आहेत आणि त्यांचा पक्ष एक राष्ट्रीय पक्ष आहे.” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
राहुल गांधी खूप पुढे आले Nara Lokesh on Rahul Gandhi।
चंद्रबाबू नायडू यांचे पुत्र म्हणाले, ‘राहुल गांधी खूप पुढे आले आहेत. मला वाटते की ते हळूहळू भारतीय राजकारणातील बारकावे आणि प्रत्येक राज्यातील विविधता समजून घेत आहेत कारण भारत खूप गुंतागुंतीचा आहे. आणि जेव्हा मी आंध्र प्रदेशकडे पाहतो तेव्हा आमच्याकडे १७५ मतदारसंघ आहेत आणि मला असे वाटते की प्रत्येक मतदारसंघ वेगळा आहे. लोक खूप वेगळे विचार करतात, प्रादेशिक आव्हाने खूप वेगळी असतात. म्हणून नेत्याने त्या बारकावे समजून घेणे खूप महत्वाचे आहे.’
पंतप्रधान मोदींनीही गावांमध्ये रात्र काढली
जेव्हा नारा लोकेश यांना,” तुम्ही दोघेही राजकीय कुटुंबातून आला आहात, तर तुम्ही लोक जास्त संघर्ष केला नाही का,? असा सवाल करण्यात आला त्यावेळी त्यांनी,”प्रत्येकाने संघर्ष केला आहे. हे फक्त राहुल जी किंवा लोकेशबद्दल नाही, प्रत्येकाने केले. प्रत्येक राजकारण्याला स्वतःची आव्हाने असतात” असे त्यांनी म्हटले. ते म्हणाले की,”पदयात्रेदरम्यान मी दिवसभर लोकांसोबत फिरायचो, लोकांना भेटायचो, त्यांच्या समस्या जाणून घ्यायचो आणि संध्याकाळी मी माझ्या लोकांशी दोन तास गप्पा मारायचो. तुम्हाला माहिती आहे की माननीय पंतप्रधानांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून भारतातील ९०% मंडळांमध्ये एक रात्र घालवली आहे. तुम्ही भारताला अशा प्रकारे समजता, भारताच्या गुंतागुंती तुम्हाला अशा प्रकारे समजतात, तुम्ही अशा प्रकारे समजता की तुम्ही प्रादेशिक गरजा समजून घ्याल” असेही त्यांनी म्हटले.
नारा लोकेश यांनी आंध्र प्रदेशात पदयात्रा काढली होती
नारा लोकेश यांनी २७ जानेवारी २०२३ रोजी आंध्र प्रदेशात ‘युवा गलम पदयात्रा’ सुरू केली होती. सुमारे ४००० किमीची ही पदयात्रा २२६ दिवसांत पूर्ण झाली. या पदयात्रेत नारा लोकेश १०० विधानसभा मतदारसंघातून गेले. जगन मोहन रेड्डी यांच्या सरकारविरुद्ध ही यात्रा काढण्यात आली. त्यांनी आरोप केला की जगन सरकारमध्ये गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार खूप वाढला आहे. नागरिक, राजकारणी, कार्यकर्ते, नागरी समाज संघटना आणि अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या या प्रवासात भाग घेतला. या प्रवासानंतर, टीडीपी सरकार आंध्र प्रदेशात परतले आणि त्यांचे वडील चंद्राबाबू नायडू पुन्हा मुख्यमंत्री झाले.
राहुल गांधी भारत जोडो यात्रेत किती किलोमीटर चालले? Nara Lokesh on Rahul Gandhi।
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबर २०२२ रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून सुरू झाली. सुमारे ५ महिने चाललेल्या या पदयात्रेत राहुल गांधी यांनी त्यांच्या पक्षाच्या अनेक नेत्यांसह, कार्यकर्त्यांसह आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह ४००० किलोमीटर चालले. तामिळनाडूनंतर, ही यात्रा केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश या राज्यांमधून जात जम्मू आणि काश्मीरमध्ये पोहोचली, जिथे १९ जानेवारी २०२३ रोजी श्रीनगरमध्ये ती संपली.





