हैदराबाद – “केसीआर” या नावाने ओळखले जाणारे तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी नीती आयोगाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्याविषयीचा निर्णय त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खरमरीत पत्र पाठवून कळवला. नीती आयोग ही यंत्रणाच निरूपयोगी असल्याची आक्रमक भूमिकाही केसीआर यांनी मांडली.
मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी देशाची राजधानी दिल्लीत नीती आयोगाची बैठक होणार आहे. बैठकीचे निमंत्रण सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. मात्र, “केसीआर” यांनी त्या बैठकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्र सरकारकडून राज्यांना भेदभावाची वागणूक दिली जाते. त्याचा निषेध करण्यासाठी बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले. राज्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकेल. राज्ये बळकट असतील तरच देश मजबूत होईल. पण, केंद्र सरकार राज्यांना समान भागीदार मानताना दिसत नाही.
महाराष्ट्राचे संपूर्ण मंत्रिमंडळ दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा होणार
केंद्र सरकारच्या कृतींमुळे देशाच्या संघराज्यीय रचनेला धक्का पोहचत आहे. रूपयाचे अवमूल्यन, महागाई, वाढती बेरोजगारी, कमी विकास दर आदी समस्यांमुळे देश अतिशय अवघड टप्प्यातून मार्गक्रमण करत आहे. पण, केंद्र सरकार केवळ मूक साक्षीदार बनले आहे. केवळ जनतेच्या भावनांशी खेळण्यात ते सरकार गुंतले आहे, अशी टीकाही केसीआर यांनी पत्रातून केली.
सकाळी स्वयंपाकपाणी, घरकाम तर दिवसभर हातात रुमणे…, महिलांच्या अंगी असलेल्या करारी बाण्याचे दर्शन