छत्तीसगडमध्ये राहुल गांधींच्या हस्ते सुरू होणार भूमिहिनांसाठी अर्थ सहाय्य योजना
Updated On:

रायपूर – कॉंग्रेस नेते राहुल गांधी 3 फेब्रुवारी रोजी छत्तीसगडची राजधानी रायपूरला भेट देणार असून ग्रामीण भागातील भूमिहीन मजुरांसाठी तेथे ते एक आर्थिक सहाय्य योजना सुरू करणार आहेत.
येथील विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर राजीव गांधी भूमिहीन कृषी मजदूर न्याय योजनेचे उद्घाटन गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
या योजनेंतर्गत, ग्रामीण भागातील नोंदणीकृत मजुरांना, ज्यांच्याकडे शेतजमीन नाही, त्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे.
मनरेगा कामगार, न्हावी, लोहार, पुजारी आदि जवळपास 4.5 लाख भूमिहीन कुटुंबांना या योजनेचा लाभ होईल, ज्यासाठी राज्य सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात 200 कोटी रुपयांची तरतूद केली होती.यापुढील काळात या योजनेचे व्याप्ती वाढवली जाणार आहे.





