BJP on Abdul Basit: पाकिस्तान केवळ भारताच्या विरोधात सातत्याने कुटिल कारवाया करत नाही, तर पाकिस्तानी नेते आणि अधिकारी देखील वारंवार धमक्या देतात. भारतातील पाकिस्तानचे माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी अलीकडेच भारतावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. दिल्ली आणि मुंबईवरील हल्ल्यांच्या धमकीमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप नेत्यांनी बासित यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. तसेच त्याच्या या वक्तव्याला सडेतोड उत्तर देखील दिले आहे. भाजपचे प्रवक्ते आरपी सिंग यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, “पाकिस्तान भारतावर हल्ला करण्याची धमकी देतो, पण प्रश्न हा आहे की अमेरिकेच्या हल्ल्यातून पाकिस्तान वाचेल का? .ते तेव्हाच हल्ला करतील जेव्हा ते सुरक्षित असतील.” असे म्हणत सडेतोड उत्तर दिले आहे. ‘ऑपरेशन सिंदूरमुळे झालेल्या जखमांमुळे पाक व्यथित ‘ BJP on Abdul Basit: याव्यतिरिक्त, भाजपचे आणखी एक प्रवक्ते, तुहीन सिन्हा यांनी या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी यावेळी, बासित यांचे वक्तव्य पाकिस्तानची हताशा दर्शवते. BJP on Abdul Basit: यातून हे दिसून येते की, ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या खोल जखमांमुळे आजही पाकिस्तान अत्यंत व्यथित असून त्यांनी आपले मानसिक संतुलन गमावले आहे.” असे म्हणत बासित यांच्यावर टीका केली. “त्या अगोदर पाकिस्तान दहा वेळा विचार करेल” सिन्हा म्हणाले की, पाकिस्तानने हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की ऑपरेशन सिंदूरनंतर त्यांचा दहशतवादाचा धंदा संपला आहे. सिंधू पाणी करार निलंबित करून भारताने पाकिस्तानचे इतके नुकसान केले आहे की, “दहशतवादाला प्रोत्साहन देण्यापूर्वी ते दहा वेळा विचार करतील.” सिन्हा यांनी मागील काँग्रेस सरकारवर पाकिस्तान-पुरस्कृत दहशतवादावर मौन बाळगल्याचा आरोप केला. अब्दुल बासित काय म्हणाले ? BJP on Abdul Basit: एका पाकिस्तानी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अब्दुल बासित म्हणाले की, जर अमेरिकेने पाकिस्तानवर हल्ला केला, तर पाकिस्तानने भारताची राजधानी दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांवर बॉम्बफेक करावी. बासित यांनी असा युक्तिवाद केला की, जेव्हा भारतीय महानगरे थेट लक्ष्यांच्या आवाक्याबाहेर असतील, तेव्हा पाकिस्तानने त्यांना लक्ष्य करण्याचा आपला इरादा कधीही सोडू नये.