Girish Mahajan : आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? मंत्री महाजनांची राऊत अन् आव्हाडांवर टीका

Girish Mahajan : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या भारत पाकिस्तानात लष्करी कारवायांना पूर्णविराम लागला आहे. भारताने युद्धबंदीची घोषणा केली असून यासाठी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रॅम यांनी मध्यस्थी केली असल्याचे बोलले जात आहे.
युद्धबंदीनंतर उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांनी माघार घ्याचची काही गरज नव्हती अशी प्रतिक्रिया देत भारत सरकार ट्रम्प यांना मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे, असा सवाल उपस्थित केला आहे. सिंदूर वैगेरे हे सर्व राजकारण खोटं आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो, असे देखील संजय राऊत म्हणाले आहेत.
तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह विरोधक ही युद्ध परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार कमी पडत असल्याची टीका करत आहेत. त्यावर आता भाजप मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार टीका केली. तसेच स्थानिक संस्थांच्या निवडणुका पुढं जातील, असं संकेत देखील महाजन यांनी दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले गिरीश महाजन ?
मंत्री गिरीश महाजन म्हणाले, पाकिस्तानने वेळीच कुरापती थांबविल्या नाही, तर त्यांना चोख प्रत्युत्तर मिळेल. भारतीय सैन्य दल व पंतप्रधान मोदींवर देशाचा पूर्ण विश्वास आहे. मात्र, खासदार संजय राऊत आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना काही काम नसल्यामुळे ते विरोध करत आहेत. युध्दजन्य परिस्थितीत पंतप्रधान, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आपल्याकडेच असे अतिरेकी असल्यावर बाहेरच्यांची गरज काय? असा प्रश्न मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
काय म्हणाले होते संजय राऊत?
युद्धबंदीनंतर संजय राऊत यांनी माघार घ्याचची काही गरज नव्हती, अशी प्रतिक्रिया देत भारत सरकार ट्रम्प यांना मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे, असा सवाल उपस्थित केला होता. सिंदूर वैगेरे हे सर्व राजकारण खोटं आहे, हे मी स्पष्टपणे सांगतो, असं देखील संजय राऊत म्हणाले होते.
भारत सरकार ट्रम्प यांची मध्यस्थी करून कोणाला वाचवत आहे. मुळात ट्रम्प कोण? नुकसान हे भारताचं झालं आहे. ट्र्म्प यांनी इस्त्राईल आणि गाझामधील युद्ध का नाही थांबवलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. जर ट्रम्प यांची मध्यस्थी जगात मान्य केली जाते. तर गाझापट्टी बेचिराख केली, एक देश उद्ध्वस्त केला. पण ट्रम्प हे इस्त्राइलच्या मागे उभे राहिले. यावेळेला मोदींचे मित्र ट्रम्प हे मोदींच्या मागे उभे राहिले नाहीत, असं देखील राऊत म्हणाले होते.




