नाशिक : मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ आहे. मुक्त विद्यापीठात कोणीही जाऊन पदवी घेऊ शकते. त्यांच्या प्रस्तावाला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अट केवळ एकच आहे त्यांनी महाराष्ट्रद्रोह्यांशी अनैतिक संबंध ठेवू नयेत, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. यावरून आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने नाशिक दौऱ्यावर आलेल्या खा. राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. अजित पवार यांच्या टीकेलाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अजित पवार हे अमित शाह यांच्या मदतीने शरद पवार यांचा पक्ष पळवून घेऊन गेले. मी नेहमी दोन नेत्यांचे कौतुक करतो ते म्हणजे राज ठाकरे आणि नारायण राणे. नारायण राणे यांनी पक्ष सोडला आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. माझी शिवसेना, मीच खरा शिवसेनाप्रमुख, असा दावा नारायण राणे यांनी कधी एकनाथ शिंदेंप्रमाणे त्यांनी माझी शिव-सेना खरी आणि मी बाळासाहेब ठाकरे हे सांगितलेले नाही. अजित पवार सांगताय की, मीच खरा. पक्षाचा बाप जन्मदाता तुमच्या व्यासपीठावर बसला आहे आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला, ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली. केला नाही. त्यांना पक्ष चालवायला जमले नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्यांनी राजकारण सुरू केले. राज ठाकरे यांनी स्वतःचा पक्ष काढला. त्यांचे आणि आमचे मतभेद तेव्हा झाले. पण त्यांनी तेव्हा स्वतःचा पक्ष काढून एक राजकारण केले, असे संजय राऊत यांनी म्हटले. गेल्या तीन वर्षांहून अधिक कालावधीपासून राज्यातील महापालिका प्रशासकीय राजवटीच्या ताब्यात आहेत. या काळात शहरांच्या विकासाचे वाटोळे झाले असून, प्रशासनाच्या माध्यमातून सत्ताधारी भ्रष्टाचाराची एक खिडकी योजना राबवून आपले इप्सित साध्य करत असल्याची टीका त्यांनी केली.