India Squad Announced : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहित-विराटची वापसी अन् वैभवला मोठी संधी, पाहा संघ
India Squad Announced : वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. एकदिवसीय संघात रोहित आणि विराट या दोघांचाही समावेश आहे.

India Squad Announced Against West Indies ODI T20I Series Rohit Virat Vaibhav Included : वेस्ट इंडिजविरुद्ध मायदेशात होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने भारतीय संघाची घोषणा केली आहे. आगामी एकदिवसीय आणि टी-२० मालिकांसाठी निवडकर्त्यांनी दोन स्वतंत्र संघ निवडले आहेत. वनडे मालिकेचे कर्णधारपद शुबमन गिलकडे सोपवण्यात आले असून वरिष्ठ फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली संघात कायम आहेत. तर दुसरीकडे, टी-२० मालिकेची कमान श्रेयस अय्यरकडे देण्यात आली असून युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय रणजी चॅम्पियन जम्मू-काश्मीरविरुद्धच्या इराणी चषक सामन्यासाठी ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचीही निवड करण्यात आली आहे.
वनडेत रोहित-विराटची जोडी; नितीश कुमार रेड्डीला आशियाई क्रीडातून थेट संधी!
एकदिवसीय संघात शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली केएल राहुल उपकर्णधार आणि यष्टिरक्षक म्हणून खेळणार आहे. फलंदाजीत ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल आणि नमन धीर यांना संधी मिळाली आहे. अष्टपैलूंमध्ये रवींद्र जडेजा आणि नितीश कुमार रेड्डी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, नितीश आधी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या संघात होता; मात्र त्याला तेथून वगळून थेट वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे संघात घेण्यात आले आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, औकिब नबी आणि गुरनूर ब्रार यांना पाचारण करण्यात आले आहे.
टी-२० मध्ये श्रेयस कर्णधार, तिलक उपकर्णधार; वैभव सूर्यवंशीचा संघात प्रवेश!
🚨 News 🚨#TeamIndia ODI & T20I squads announced for West Indies tour of India 2026, along with updated squad for Japan T20I & Asian Games.
More Details ▶️https://t.co/Lxx3Bz8Q14 pic.twitter.com/Y9RGlQ09XK
— BCCI (@BCCI) September 16, 2026
टी-२० संघात आक्रमक फलंदाजांचा भरणा असून तिलक वर्माकडे उपकर्णधारपद दिले आहे. सलामीवीर म्हणून अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन आणि युवा वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली आहे. फिरकीची धुरा अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवी बिश्नोई सांभाळतील; तर वेगवान आक्रमणात अर्शदीप सिंग, मयंक यादव आणि प्रिन्स यादव यांचा समावेश आहे. दरम्यान, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील रेस्ट ऑफ इंडिया संघात सर्फराझ खान उपकर्णधार असेल.
२७ सप्टेंबरपासून महासंग्राम; ५ टी-२० आणि ३ वनडेचे संपूर्ण वेळापत्रक!
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील ३ सामन्यांची वनडे मालिका २७ सप्टेंबरपासून (तिरुवनंतपुरम, गुवाहाटी, न्यू चंदीगड) रंगणार आहे. तर ५ सामन्यांची टी-२० मालिका ६ ते १६ ऑक्टोबर दरम्यान लखनौ, रांची, इंदूर, हैदराबाद आणि बंगळुरू येथे खेळवली जाईल.
भारताचा एकदिवसीय संघ: शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल (उपकर्णधार, यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल, नमन धीर.
भारताचा टी-२० संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव,अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, मयंक यादव.





