Team India Squad : बीसीसीआयने भाकरी नव्हे, तर अख्खा तवाच फिरवला! श्रेयस टीम इंडियाचा नवा सरपंच, ‘या’ ११ खेळाडूंना केलं बाहेर
Team India Squad : हसा एशियन गेम्ससाठी दुय्यम (B Team) संघ पाठवण्याची प्रथा मोडीत काढत बीसीसीआयने यंदा आपला मुख्य आणि पूर्ण ताकदीचा संघ मैदानात उतरवला आहे.

Team India Squad Announce for Asian Games 2026 : जपानमधील आयची-नागोया (Aichi-Nagoya) येथे होणाऱ्या आगामी ‘एशियन गेम्स २०२६’ (आशियाई खेळ) साठी बीसीसीआयने शनिवारी अत्यंत धक्कादायक आणि क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. सहसा एशियन गेम्ससाठी दुय्यम (B Team) संघ पाठवण्याची प्रथा मोडीत काढत बीसीसीआयने यंदा आपला मुख्य आणि पूर्ण ताकदीचा संघ मैदानात उतरवला आहे. हा निर्णय घेताना निवड समितीने कमालीचे कडक पाऊल उचलले असून, गेल्या वेळी एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या कर्णधारासह तब्बल ११ खेळाडूंना थेट बाहेरचा रस्ता दाखवला आहे. (Team India Squad)
सूर्याचा पत्ता कट; श्रेयस अय्यर नवा ‘किंग’! (Team India Squad)
मुंबईत पार पडलेल्या निवड समितीच्या हाय-व्होल्टेज बैठकीत मोठे फेरबदल करण्यात आले. टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला थेट संघातून डच्चू देण्यात आला आहे. त्याच्या जागी सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरला भारतीय टी-२० संघाचा नवा कर्णधार घोषित करण्यात आले आहे, तर युवा फलंदाज तिलक वर्मा याच्याकडे उपकर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
बीसीसीआयने भाकरी नव्हे, अख्खा तवाच फिरवला! (Team India Squad)
Presenting #TeamIndia‘s newest T20I captain 🇮🇳
Congratulations to Shreyas Iyer as he takes the helm in the shortest format of the game 👏@ShreyasIyer15 pic.twitter.com/frfAXAOkTA
— BCCI (@BCCI) June 6, 2026
४ वर्षांपूर्वी (२०२२ च्या हँगझू एशियन गेम्समध्ये) ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारताने युवा संघ पाठवला होता. मात्र, यंदा बीसीसीआयने संपूर्ण संघच बदलला आहे. गेल्या वेळच्या विजेत्या संघातील ११ खेळाडूंना बाहेर करत, यंदा थेट टी-२० विश्वचषकाचा मुख्य भाग असलेल्या १० दिग्गज खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. यामध्ये जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, इशान किशन आणि अर्शदीप सिंग यांसारखे स्टार खेळाडू जपानमध्ये सुवर्णपदकासाठी खेळताना दिसतील. (Team India Squad)
Here’s a look at #TeamIndia‘s squad for the Asian Games 2026 in Japan this September 👏#AsianGames pic.twitter.com/euMfmhWEcN
— BCCI (@BCCI) June 6, 2026
संघात केवळ ५ खेळाडू असे आहेत जे विश्वचषक विजेत्या संघाचा भाग नव्हते. यामध्ये कर्णधार श्रेयस अय्यर, नितीश कुमार रेड्डी, रवी बिश्नोई, दुखापतीतून पुनरागमन करणारा हर्षित राणा आणि १५ वर्षांचा युवा खळबळजनक फलंदाज वैभव सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या पूर्ण ताकदीच्या संघामुळे भारताची सुवर्णपदकाची दावेदारी मजबूत झाली आहे.
एशियन गेम्ससाठी भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), रवी बिश्नोई, अभिषेक शर्मा, नितीश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन, अक्षर पटेल, हर्षित राणा, इशान किशन, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंह, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती आणि वैभव सूर्यवंशी.





