Bangladesh violence : बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत तब्बल ‘इतके’ जण ठार; आकडा ऐकून बसले धक्का !

Bangladesh violence | Sheikh Hasina – बांगलादेशात १६ जलै ते ११ ऑगस्ट दरम्यान झालेल्या हिंक आंदोलनादरम्यान एकूण ६५० जण ठार झाले आहेत, असे संयक्त राष्ट्राच्या मानवाधिकार कार्यालयाने प्राथमिख माहीतीच्या आधारे म्हटले आहे.
न्याय्यबाह्य हत्या, अन्याय्य पद्धतीने करण्यात आलेल्या अटक आणि ताब्यात घेतले जाण्याच्या प्रकरणांची पारदर्शक आणि सखोल तपासणी व्हायला हवी, अशी अपेक्षाही मानवाधिकार कार्यालयाने व्यक्त केली आहे.
या १० पानी प्राथमिक अहवालानुसार बांगलादेशात १६ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान सुमारे ४०० जण ठार झाले. तर ५ आणि ६ ऑगस्ट दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या नव्या लाटेमध्ये अतिरिक्त २५० जण ठार झाले.
या हिंसाचारामुळेच पंतप्रधान शेख हसीना या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशाबाहेर निघून गेल्या होत्या, असेही या १० पानी अहवालामध्ये म्हटले आहे.
दिनांक १६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान झालेल्या हिंसाचारात किमान ६०० जण ठार झाले असे बांगलादेशातील माध्यमे आणि आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.





