Gulabrao Patil : लवकरच उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का? शिंदेंच्या शिलेदाराने स्पष्टचं सांगितलं “फक्त थोडा वेळ थांबा, 14 नव्हे तर…”
Gulabrao Patil : ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांविरोधात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे आणि मेळाव्यांची घोषणा केली आहे.

Gulabrao Patil : महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर 3.0’ची चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता ठाकरेंचे काही आमदारही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले असतानाच शिवसेना पक्षाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘ऑपरेशन टायगर 3.0’ सुरू असल्याची घोषणा केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले, “ऑपरेशन टायगर 3.0’ची सुरुवात झाली आहे. फक्त थोडा वेळ थांबा, 14 नव्हे तर त्यापेक्षाही जास्त आमदार आमच्यासोबत येतील.” त्यांच्या या विधानामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली आहे. तसेच “एकनाथ शिंदे फार बोलत नाहीत, फक्त दाढीवर हात फिरवतात आणि ऑपरेशन टायगर यशस्वी होतं.” असेही ते म्हणाले. त्यांनी केलेल्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूंकप होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. (Gulabrao Patil)
दरम्यान, ठाकरे गटातून बाहेर पडलेल्या सहा खासदारांविरोधात उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून फुटीर खासदारांच्या मतदारसंघांमध्ये दौरे आणि मेळाव्यांची घोषणा केली आहे. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी “उद्धव ठाकरे यांनी फिरलंच पाहिजे. मुलाने केले नाही तर बापाने करावंच लागतं.” असा टोला आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता लगावला.
संजय दिना पाटलांना दिला महत्वाचा सल्ला (Gulabrao Patil)
नुकतेच शिंदे गटात दाखल झालेले खासदार संजय दिना पाटील पत्रकारांना अर्वाच्च भाषेत बोलल्याचा प्रकरणी मोठ्या वादात सापडले आहेत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट धमकी आणि शिवीगाळ केली. असे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओतून समोर आले आहे. हे प्रकरण अंगाशी आल्यानंतर अखेर संजय दिना पाटील यांनी एक व्हिडिओ शेअर करत झालेल्या प्रकाराविषयी दिलगिरी व्यक्त केली. या प्रकरणावर गुलाबराव पाटील यांनी त्यांना महत्वाचा सल्ला दिला.
काय म्हणाले गुलाबराव पाटील? (Gulabrao Patil)

Gulabrao Patil : लवकरच उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का? शिंदेंच्या शिलेदाराने स्पष्टचं सांगितलं “फक्त थोडा वेळ थांबा, 14 नव्हे तर…”
“असं व्हायला नाही पाहिजे, पत्रकार हा देशाचा चौथा स्तंभ आहे. तो आपला आरसा आहे आरशाला दगड मारू नये. वादविवाद होत असतात, आमचेही होतात. पण याचा अर्थ मारामारी करणे, शिवीगाळ करणे असा होत नाही. यापुढे असं काही होऊ नये असा सल्ला त्यांना देईन.” असं गुलाबराव पाटील म्हणाले.





