Manipur : मणिपूरसाठी पुन्हा धोक्याची घंटा ! म्यानमारमधून तब्बल ९०० दहशतवाद्यांचा शिरकाव; हाय अलर्ट जारी

Manipur – शेजारी देश म्यानमारमधून सुमारे ९०० दहशतवादी मणिपूरमध्ये घुसले असून हे दहशतवादी राज्यात काही मोठी घटना घडवण्याचा कट रचत आहेत असा सावधगिरीचा इशारा गुप्तचर संस्थांच्या अहवालात देण्यात आला आहे.
मणिपूर सरकारचे सुरक्षा सल्लागार कुलदीप सिंग यांनीही गुप्तचर विभागाच्या या दाव्याची पुष्टी केली आहे. दहशतवाद्यांचा धोका लक्षात घेता सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
म्यानमारला लागून असलेल्या डोंगराळ भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हा डोंगराळ भाग कुकी बहुल क्षेत्र आहे. मिळालेल्या माहितीनुसार, म्यानमारमध्ये घुसलेले दहशतवादी ड्रोन चालवण्यातही तरबेज आहेत.
गुप्तचर विभागाचा अहवाल राज्यातील सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. अहवालात दावा करण्यात आला आहे की हे दहशतवादी ३०-३० च्या गटात राज्यभर पसरू इच्छित आहेत.
हे दहशतवादी मेईतेईचे वर्चस्व असलेल्या भागांना लक्ष्य करण्याची योजना आखत आहेत. अहवालाबाबत कुलदीप सिंह म्हणाले की, गुप्तचर विभागाच्या अहवालाबाबतची बातमी शंभर टक्के खरी असून अहवालावर विश्वास ठेवायला हवा. १ सप्टेंबरपासून मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार वाढला आहे.





