मुंबई – राज्यसभा आणि विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरत गाठत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केले. त्यानंतर महाविकास आघाडीतून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीसोबत सरकार स्थापन केले. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिवसेना संपवीन्याचे कारस्थान सुरू असल्याचा आरोप करत आधी शिवसेना आमदार बाहेर पडले, तर आता खासदारही तयारीत असल्याचा शिंदे गटाकडून दावा केला जात आहे. दरम्यान, ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईत शिवसेनेला खिंडार पडले असून शिवसेनेचे 30 ते 32 नगरसेवक शिंदे गटात सामिल होण्याच्या तयारीत आहेत. ते गुरुवारी रात्री 9 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.
बुधवारी ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात सहभागी झाले आहेत. नवी मुंबई महापालीकेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले, सुरेश कुलकर्णी, शिवराम पाटील, किशोर पाटकर असे ज्येष्ठ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार आहेत. यामध्ये ऐरोली मतदारसंघातील जवळपास 90 टक्के नगरसेवकांचा समावेश आहे.
नवी मुंबईत शिसेनेचे 50 नगरसेवक आहेत. त्यामधील 30 ते 32 जण एकनाथ शिंदे गटात सहभागी होणार आहेत. आगामी काळात उर्वरित नगरसेवकांना देखील गळाला लावण्याचे काम शिंदे गटाकडून होणार आहे. त्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या शिनसेनेसाठी हा मोठा धक्का आहे.
पंढरपूर : वारकरी हा केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात – मुख्यमंत्री शिंदे