Maharashtra politics : ‘ठाकरेंच्या 16 आमदार, 7 खासदारांशी अंतिम चर्चा’; शिंदे गटाच्या बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
Maharashtra politics : "उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील १६ आमदार आणि ७ खासदारांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम चर्चा पूर्ण झाली असून, आता केवळ त्यांच्या पक्षप्रवेशाची अधिकृत तारीख ठरायची बाकी आहे

Maharashtra politics : राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांदरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. (Maharashtra politics)
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 16 आमदार आणि 7 खासदारांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम चर्चा पूर्ण झाली असून, आता केवळ प्रवेशाची तारीख ठरायची आहे, असा दावा त्यांनी केला आहे. (Maharashtra politics)
कृपाल तुमाने यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असल्याने संबंधित आमदार आणि खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असून लवकरच मोठी राजकीय घडामोड घडेल, असेही त्यांनी म्हटले. (Maharashtra politics)
दरम्यान, काही दिवसांपूर्वी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीला 9 पैकी 5 खासदारांनी ऑनलाइन उपस्थिती लावली होती. त्यानंतरच ठाकरे गटातील काही खासदारांच्या भूमिकेबाबत विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. (Maharashtra politics)
उदय सामंतांनी दावे फेटाळले
कृपाल तुमाने यांच्या दाव्यानंतर शिंदे गटाचे वरिष्ठ नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली. “उद्धव ठाकरे गटातील कोणत्याही खासदाराशी आमचा संपर्क नाही. अशा प्रकारची कोणतीही बैठक झालेली नाही. आम्हाला ‘ऑपरेशन टायगर’ची गरजही नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. (Maharashtra politics)
यावेळी त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांचाही उल्लेख करत, “संजय राऊत यांच्या संयमामुळेच उबाठा पक्षाचे अस्तित्व टिकून आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. (Maharashtra politics)
रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया
दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनीही या चर्चांवर भाष्य केले. “ठाकरे गटातील खासदार वेगळा गट स्थापन करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, तो गट प्रत्यक्षात स्थापन होतो की नाही, हा निर्णय संबंधित पक्षाचाच असेल. या संपूर्ण प्रक्रियेशी भारतीय जनता पक्षाचा कोणताही संबंध नाही,” असे दानवे यांनी स्पष्ट केले. (Maharashtra politics)





