तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी
दौंड- दौंड तालुक्यातील वीज भारनियमन कमी व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आल्यानंतर याबाबतच्या सूचना भिमा-पाटसचे अध्यक्ष तथा आमदार ऍड. राहुल कुल यांनी वितरण विभागास दिल्या आहेत.
दौंड तालुक्यातील भारनियमन प्रश्नावर दौंड शहर व ग्र्रामिण भागातील शेतकरी, व्यापारी व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात शेतीपीकांना पाणी देण्याकरिता भारनियमनामुळे अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सध्या, उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यातच भारनियमन वाढल्याने कृषीपंपाना आठ तास मिळणारा विजपुरवठाही वारंवार खंडीत होत आहे. तसेच, कमी दाबाने वीज पुरवठा मिळत असल्याने रोहित्र वारंवार जळून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पीण्याचा पाण्याचाही प्र्रश्न गंभीर होत चालला आहे. यामुळेच विजेचे भारनियमन तातडीने कमी करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.