ZP Election Pune – केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरेखा रमेश हरगुडे, केसनंद वाडेबोल्हाई पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीकडून प्रमोद चंद्रकांत हरगुडे, हवेली कोरेगाव मूळ पंचायत समिती गणातून कृषिराज दत्तात्रेय चौधरी या तिन्ही उमेदवारांना विविध सोसायट्या, वाड्या वस्तीवर नागरिकांशी थेट संवाद साधून मुलभूत सुविधांवर भर देत ते सोडवण्याचे आश्वासन दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या या तिन्ही उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा वाढू लागत असल्याचा विश्वास जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार दौरा साधेपणानं सुरू असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या गटातील व विविध ठिकाणी उमेदवारांनी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी पाणीपुरवठा, रस्ते, सांडपाणी, कचराव्यस्थापन, वाहतूक, स्वच्छता, सुरक्षा, नागरी सुविधा या महत्त्वाच्या विषयांवर उमेदवारांनी आपली विकासाची स्पष्ट भूमिका मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस नागरिकांच्या अपेक्षा, सूचना व समस्या जाणून घेत त्यावर उपाययोजना करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुरेखा रमेश हरगुडे म्हणाल्या, आरोग्य, वाहतूक, मूलभूत सुविधा या मुद्द्यांवर ठोस व वेळबद्ध काम करणे ही आमची प्राथमिकता आहे. पंचायत समिती गणाचे राष्ट्रवादीचे उमेदवार प्रमोद हरगुडे यांनी सांगितले,“नागरिकांच्या रोजच्या अडचणी समजून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे हेच आमचे ध्येय आहे. हवेली कोरेगाव मूळ पंचायत समिती गणाचे कृषिराज दत्तात्रेय चौधरी म्हणाले की, विकास हा लोकांशी संवादातूनच घडतो. लोकसहभागातूनच खरा विकास घडतो. तोच आमच्या कामाचा पाया असेल,” असा विश्वास व्यक्त केला. प्रचारात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून केसनंद गटात विकासकेंद्रित व लोकाभिमुख नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “केसनंद कोरेगाव मूळ गटात प्रगतीसाठी, रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या प्रश्नांच्या कायमस्वरूपी निवारणासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या भागाच्या उज्वल भविष्यासाठी, उमेदवाराला विकासाचा हा रथ असाच पुढे नेण्यास साथ द्या.” – सुरेखा रमेश हरगुडे, जिल्हा परिषद गट, उमेदवार.