Yuzvendra Chahal : ‘…तर नातं साडेचार वर्ष टिकलं नसतं’, धनश्री वर्माच्या फसवणुकीच्या आरोपांना युझीने दिलं चोख प्रत्युत्तर

Yuzvendra Chahal reacts on Dhanshree Verma Allegations : भारतीय फिरकीपटू युझवेंद्र चहल सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. एका रियलिटी शोमध्ये त्याच्या एक्स वाइफ धनश्री वर्माने केलेल्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अशी अफवा पसरली की, चहल यांनी लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यांतच धनश्रीला फसवले होते. या आरोपांना चहलने पूर्णपणे खोडून काढले असून, हे सर्व बिनबुडाचे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे. तो आता या प्रकरणाला पूर्णविराम देऊन आपल्या क्रिकेट कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करत आहे.
युझवेंद्र चहलने दिले स्पष्टीकरण –
युझवेंद्र चहलने धनश्री वर्माच्य आरोपांना निराधार आणि कंटाळवाणे ठरवले आहे. हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना तो म्हणाला, “मी एक खेळाडू आहे आणि मी कोणालाही फसवत नाही. जर कोणी लग्नाच्या दोन महिन्यांतच फसवणूक केली असती, तर इतके वर्षे नाते टिकले असते का? माझ्यासाठी हा अध्याय संपला आहे. मी माझ्या आयुष्यात पुढे गेलो आहे आणि इतरांनीही तसेच करावे. आमचे लग्न साडेचार वर्षे टिकले.”
त्यांचे घर अजूनही माझ्या नावाने चालते – चहल
चहल पुढे म्हणाला, “जर दोन महिन्यांत फसवणूक झाली असती, तर साडेचार वर्षे नातं पुढे गेलं असतं? मी यापूर्वीही सांगितले आहे की, मी भूतकाळातून बाहेर पडलो आहे. पण काही लोक अजूनही तिथेच अडकले आहेत. त्यांचे घर अजूनही माझ्या नावाने चालते, त्यांना हवे तर ते तसेच चालवू शकतात. मला याचा काही फरक पडत नाही आणि मी यामुळे प्रभावितही होत नाही. माझ्या आयुष्यातील त्या अध्यायाबाबत मी शेवटचे बोलत आहे.”
हनुमान चालिसामुळे मिळते प्रेरणा –
आपल्या आयुष्याबद्दल बोलताना चहल म्हणाला, “त्या काळात मला यश मिळेल याची अपेक्षा नव्हती. मी फक्त खेळाचा आनंद घेत होतो. मला खेळायला आवडते आणि मी त्यावरच लक्ष केंद्रित केले. यश मिळाले का? नक्कीच. आयुष्य आता सुखकर आहे. माझी आई आनंदी आहे, मी आनंदी आहे. जेव्हा मला अडचण जाणवते, तेव्हा मी हनुमान चालिसा ऐकतो. मी दररोज रात्री हनुमान चालिसा ऐकतो. प्रत्येक सामन्यापूर्वी मी ते ऐकतो. यामुळे मला प्रचंड शक्ती आणि एकाग्रता मिळते.”
हेही वाचा – Harshit Rana : अश्विनचा हर्षित राणाच्या निवडीवर ‘गंभीर’ सवाल, काय आहे कारण?
युझी पुढे म्हणाला, “बाकी गोष्टी सतत चालत राहतात, पण त्या माझ्यासाठी चांगल्या आणि काहीशा विचलित करणाऱ्या आहेत. मी माझा वेळ कुटुंब आणि मित्रांसोबत घालवतो.” तो आता भूतकाळ विसरून क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे आणि त्याच्या चाहत्यांना त्याच्या खेळातून आणखी उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.





