Yuvraj On Protest : “भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी…”, विद्यार्थ्यांच्या आंदोलनांबाबत युवराज सिंगचे सरकारला आवाहन
Yuvraj On Protest : सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने सरकार आणि 'कॉकरोच जनता पार्टी' यांना आपापसातील वाद संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचे आवाहन केले आहे.

Yuvraj Singh Insta Post For Education Reform Protest : शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या तीव्र आंदोलनादरम्यान भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) शांतता आणि संवादाचा संदेश दिला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने सरकार आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) यांना आपापसातील वाद संवादाच्या माध्यमातून सोडवण्याचे आवाहन केले आहे. (Yuvraj On Protest )
“संवादातूनच निघेल मार्ग” – युवराज सिंग (Yuvraj On Protest)
युवराजने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “प्रत्येक विद्यार्थ्याला, महिला आणि पुरुषाला शांततेत शिकण्याचा, सुरक्षित वातावरणात पुढे जाण्याचा आणि स्वप्ने पूर्ण करण्याचा अधिकार आहे. त्यांचा विकास हेच सशक्त भारताचा पाया आहे. भारत देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चर्चेच्या माध्यमातून मार्ग काढला जाऊ शकतो.”
Breaking
Yuvraj Singh छात्रों के विरोध प्रदर्शन का समर्थन करने वाले पहले भारतीय क्रिकेटर बने। pic.twitter.com/0EjH6MQb2h
— Dinesh Purohit (@Imdineshpurohit) July 23, 2026
संसद मार्च, लाठीचार्ज आणि ६० हून अधिक जखमी! (Yuvraj On Protest)
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सीजेपीच्या आवाहनानुसार हजारो आंदोलकांनी संसदेवर धडक मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रस्ते अडवल्याने आणि लाठीचार्ज तसेच अश्रूधुराचा वापर केल्याने भीषण चकमक उडाली. यामध्ये सुमारे ६० आंदोलक जखमी झाले आहेत. तरीही आंदोलक जंतर-मंतरवर ठिय्या मांडून बसले आहेत. मंगळवारी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शवला.
सोनम वांगचुक यांना उपोषण सोडण्याची विनंती! (Yuvraj On Protest )
🚨YUVRAJ SINGH’s INSTAGRAM STORY ON ONGOING PROTEST IN INDIA🇮🇳 pic.twitter.com/jGHFfkoS9Y
— TheWicketReport (@WicketReport) July 22, 2026
याचदरम्यान, सीजेपीने सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पत्र लिहून उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. “तुमच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. तुम्ही उपोषण सोडले तरी शिक्षण सुधारणेचा हा लढा मागण्या पूर्ण होईपर्यंत सुरूच राहील,” असे आश्वासन संघटनेने दिले आहे.





