Nana Patole: “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जाहिरात करता, मग उद्योगपतींचं कर्जमाफ…”; नाना पटोलेंचा राज्य सरकारला सवाल
Nana Patole: लाडकी बहिण योजनेवरूनही नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला

Nana Patole: काँग्रेस नेते नाना पटोले यांनी शेतकरी कर्जमाफी, उद्योगपतींच्या कर्जमाफीचा मुद्दा आणि लाडकी बहीण योजना या मुद्यांवरून राज्य सरकारवर टीका केली आहे. लाडक्या बहिणींना बेईमान भावांनी फसवलं, असा थेट गंभीर आरोप नाना पटोलेंनी सरकार केला आहे. भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील चारभट्टी येथील श्रावण मास समाप्ती या धार्मिक कार्यक्रमात नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं आहे. (Nana Patole)
नेमकं काय म्हणाले नाना पटोले? (Nana Patole)
लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना खात्यावर दर महिन्याला दीड महिन्यांची आर्थिक मदत करते. यावरुनच नाना पटोलेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. “सरकार एका बाजूला 1500 रुपये देण्याचे नाटक करतं आणि दुसऱ्या बाजूला महिलांच्या इतर महत्त्वाच्या योजना हळूहळू बंद करतं आहे. हे सरकार म्हणजे बहिणींचे सख्खे भाऊ नाहीत, तर बेईमान भाऊ आहेत,” असा टोला पटोले यांनी नाव न घेता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लगावला.

Nana Patole: “शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जाहिरात करता, मग उद्योगपतींचं कर्जमाफ…”; नाना पटोलेंचा राज्य सरकारला सवाल
तसेच सरकार ‘लाडकी बहीण’ योजनेचे 17 हजार कोटी आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे 13 हजार कोटी दिल्याची जाहिरात टीव्ही आणि वृत्तपत्रांमध्ये करते. पण 10 बड्या उद्योगपतींचं तब्बल साडेतीन लाख कोटी रुपयांचं कर्जमाफ केलं, त्याची जाहिरात सरकारनं कधी टीव्हीवर दाखवली का?, असा सवालही त्यांनी केला. (Nana Patole)
उद्योगपतींचे साडेतीन लाख कोटी माफ करण्याऐवजी ही रक्कम जर राज्यातील शेतकऱ्यांसाठी वापरली असती, तर पुढील 10 ते 12 वर्षे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा राहिला असता, असेही पटोले म्हणाले.
दरम्यान, नाना पटोले यांच्या या आरोपांवर आता महायुती सरकारकडून काय प्रत्युत्तर मिळणार हे पाहावे लागेल. Nana Patole
हेही वाचा:
US Iran Tensions: “आम्ही इराणला पूर्णपणे संपवून टाकू”; अमेरिकेच्या संरक्षण सचिवांचा इराणला इशारा





