Maharashtra Politics : मोठी बातमी..! राज्यात पुन्हा भूकंप? ते 24 आमदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार? राजकीय वर्तुळात खळबळ
Maharashtra Politics : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरचा राजकीय भूकंप अद्याप शांत झालेला नाही,

Maharashtra Politics : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा वेग आला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आता आमदारांच्या संभाव्य पक्षांतराची चर्चा रंगू लागली आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर राहिल्यानंतर मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले आहे. (Maharashtra Politics)
शिवसेना ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा सुरू केला आहे. याचदरम्यान ठाकरे गटाने बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीला चार आमदार अनुपस्थित राहिल्याची चर्चा झाली होती. (Maharashtra Politics)
महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर
यानंतर महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक झाली. या बैठकीला तब्बल 24 आमदार गैरहजर राहिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय चर्चांना आणखी वेग आला. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, “महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर राहिले. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, हे विचारलं पाहिजे. (Maharashtra Politics)
महाविकास आघाडीच्या नेतृत्वाबाबत अनेक आमदार नाराज आहेत. जर कोणी स्वेच्छेने एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारू इच्छित असेल, तर त्याला आम्ही का विरोध करू? आम्ही त्या आमदारांशी चर्चा करून त्यांची नाराजी समजून घेऊ.” (Maharashtra Politics)
‘ऑपरेशन आमदार’ची चर्चा रंगली
सामंत यांच्या या विधानानंतर राज्यात आता ‘ऑपरेशन आमदार’ सुरू होणार का, अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शिवसेना ठाकरे गटातील खासदारांनंतर आता महाविकास आघाडीतील काही आमदारही सत्ताधारी गटात जाणार का, याबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. (Maharashtra Politics)
उद्धव ठाकरेंवरही निशाणा
उद्धव ठाकरे यांच्या सुरू असलेल्या महाराष्ट्र दौऱ्यावरही उदय सामंत यांनी टीका केली. “ते किती दिवस दौरे करतात ते पाहू. त्यांच्या भाषणात फक्त ‘गद्दार, गद्दार’ एवढाच विषय असतो. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसोबत गद्दारी केली, त्यांनी इतरांना गद्दार म्हणू नये,” असा टोला त्यांनी लगावला. (Maharashtra Politics)
दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या आमदारांच्या गैरहजेरीमागील कारणे अद्याप स्पष्ट झालेली नाहीत. त्यामुळे आगामी काही दिवसांत राज्याच्या राजकारणात आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Maharashtra Politics)






