सांगली : राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा फटका बसल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सातत्यानं ईव्हीएमवर शंका उपस्थित करण्यात आली. तसेच बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावाने या संदर्भात आंदोलनदेखील केले होते. यानंतर आता सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहे गावानं देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. काय आहे नेमके प्रकरण? ईव्हीएम हटवण्यासाठी राज्यातील काही गावातून बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावानांतर आता सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहे गावानं देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे, जर सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा ग्रामस्थांकडून यावेळी देण्यात आला. ईव्हीएम हटाव आणि बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशी भूमिका सोलापूर जिल्ह्यातल्या मारकडवाडी गावाने घेतली आणि अख्ख्या देशाचे लक्ष या गावाकडे लागलं. मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं पाऊल देखील गावाने उचललं, मात्र सरकारने ते दडपले. आता मारकडवाडीतून सुरू झालेल्या या आंदोलनाचं लोन राज्यातील काही गावांपर्यंत पोहोचलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या बहे गावानं देखील बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. ग्रामसभेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे, स्वातंत्र्य सेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या बहे गावाने हा ठराव घेत इस्लामपूर तहसीलदारांकडे तो सुपूर्द केला आहे. ईव्हीएमवर मतदान झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालू असा इशारा येथील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे सरकार आता या मागणीवर काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.