मुंबई – शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर शिवसेनेला खिंडार पडले आहे. या बंडखोरीनंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्याकडून एकमेकांवर सतत टीका केली जात आहे. दरम्यान, एका वृत्त वहिनीसोबत बोलत असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि बंडखोरांवर पुन्हा एकदा टीका केली आहे.
माध्यमांशी बोलतांना संजय राऊत म्हणाले,’खोट्या केसेस टाकून अटक करायची असेल तर शिवसैनिक म्हणून सेनेसाठी अटकेला सामोरा जाणार. मी कुठेही मला वाचवा म्हणून कुणासमोर गुडघे टेकणार नाही. संजय राऊत बाहेर असले तर या सरकारला अडचणी येतील, असं वक्तव्य राऊत यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले,’महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री 4 वेळाही दिल्लीला आले नाहीत. आताचे मुख्यमंत्री 5 वेळा आले. सेनेचे मुख्यमंत्री म्हणून जर कुणी घेत असतील तर सेनेच्या मुख्यमंत्र्याला दिल्लीत यावं लागलं नाही. सेनेचे हायकमांड मुंबईतच आहेत. ते दिल्लीला स्थायिक होतात की काय अशी परिस्थिती झाली आहे.’ असा टोला राऊत यांनी शिंदेंना लगावला आहे.