Uddhav Thackeray : “धर्मेंद्र प्रधान यांच्या चुकांवर सरकार का पांघरुण घालतंय”; उद्धव ठाकरेंचा नागपुरातून थेट सवाल
Uddhav Thackeray : सोनम वांगचुक यांच्यावर केलेल्या कारवाईवर उद्धव ठाकरेंनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.

Uddhav Thackeray criticizes the Central Government : आज नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनसाठी उद्धव ठाकरे नागपूरमध्ये दाखल झाले आहेत.
नागपूरमध्ये दाखल होताच त्यांनी सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरुन हटवण्यात आलं. या कारवाईवर प्रतिक्रिया देत केंद्र सरकावर टीका केली.
“अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार” असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला विचारला. सोनम वांगचुक यांच्यावर केलेल्या कारवाईवर उद्धव ठाकरेंनी तीव्र शब्दांत निषेध नोंदवला.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“अजून किती बळी घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार ते एकदा जाहीर करावं, कारण वांगचुक हे स्वतःच्या प्राणांची आहुती द्यायला तयार झालेले आहेत. यापूर्वीच नीट पेपर लीकमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मग एवढ्या आत्महत्या होऊन सुद्धा धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलंय की यांच्या चुकांवर सरकार पांघरुन घालतयं.” असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.
…तर दिल्ली पोलिसांनी आदेश दाखवावा : उद्धव ठाकरे
आज सकाळी जी कारवाई झाली ती कोर्टाच्या आणि वैद्यकीय सल्लानुसार करण्यात आल्याचा दावा दिल्ली पोलिसांकडून केला जात आहे. यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले कि, उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या तब्येतीची काळजी घायला लावले होते. त्यांना उचलून रुग्णालयात टाका असे कुठे हि म्हटलेलं नाही, असे असेल तर दिल्ली पोलिसांनी आदेश दाखवावा.
अजूनही वेळ गेलेली नाही : उद्धव ठाकरे
राज्यात आणि देशात या पूर्वी देखील अनेक उपोषणे झाले आहे. अगदी स्वतंत्रपूर्व काळात देखील महात्मा गांधी यांनी उपोषण केलंय, नंतर देखील केलंय. चर्चा केल्यानंतर उपोषण सोडलं जातं. काँग्रेसचं सरकार असताना अण्णा हजारेंच्या बाबतीत देखील चर्चा करून उपोषण सोडण्यात आलं होत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी आणि उपोषण सोडवावे, असं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं.






