Bachchu Kadu : “निसंकोच एकनाथ शिंदेंशिवाय आहे कोण”; राऊतांच्या मुख्यमंत्री पदाच्या भाकितावर बचू कडूंचं मोठं विधान
Bachchu Kadu : संजय राऊतांच्या दाव्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या गोठातून मोठा दावा करण्यात आला आहे.

Bachchu Kadu : उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्रिमंडळात गेल्यानंतर राज्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हातात संपूर्ण कारभार येईल, असा मोठा दावा संजय राऊत यांनी केला आहे. थोडक्यात फडणवीस हे केंद्रात नेतृत्व करतील तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील, असा अर्थ काढला जात आहे.
यानंतर राजकारणात मोठ्या उलथापालथ होणार असल्याची चर्चा जोर धरली असतानाच संजय राऊतांच्या दाव्यावर शिंदेंच्या शिवसेनेच्या गोठातून मोठा दावा करण्यात आला आहे.
केंद्रात देवेंद्र फडणवीस गेले तर एकनाथ शिंदे राज्याचे नेतृत्व करतील ते मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेनेचे आक्रमक नेते आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. हा बदल पुढील काही महिन्यात पाहायला मिळू शकते, असेही ते म्हणाले आहेत. (Bachchu Kadu)
नेमकं काय म्हणाले बच्चू कडू? (Bachchu Kadu)
“प्रत्येक महाराष्ट्रातील माणसाला असं वाटतं की महाराष्ट्रातील माणसाने देशाचे नेतृत्व करावं, ज्याप्रमाणे आम्ही बघतोय की एक काळ असा होता का मराठ्यांचं राज्य दिल्लीभर नाही तर देशभर होतं, त्यांनी मराठे म्हणून तिथे जावं आणि देशाचं नेतृत्व करून महाराष्ट्राचं उज्वल स्वप्न पूर्ण केलं पाहिजे.” असं मोठं विधान बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी केलं आहे.
एकनाथ शिंदेंशिवाय आहे कोण? (Bachchu Kadu)
तर दिल्लीत फडणवीस गेले तर महाराष्ट्राचं नेतृत्व कोणी करावं असा प्रश्न विचारताच ते तर निसंकोच आहे एकनाथ शिंदेंशिवाय आहे कोण? असे म्हणाले आहेत. “ज्यांनी एवढा मोठा उठाव केला, पार्टी बदलली नसती तर सत्ता बदलली नसती, सत्ता बदलली नसती तर आज सत्तेत भाजप-शिवसेना दिसली नसती.” असा दावा केला. “संख्या महत्वाची नसून नैतिकता महत्वाची असते. ज्याप्रमाणे बिहारमध्ये नितेश कुमार यांना संख्याबळ नसताना मुख्यमंत्री केलं होतं तेचं मोजमाप येथे असलं पाहिजे.” असेही कडू यांनी म्हटलं आहे.
राऊतांच्या दाव्याची कडूंनी उडवली खिल्ली (Bachchu Kadu)
भाजपची पुर्नवापरसी एकनाथ शिंदे यांच्यामुळे झाली, त्यांनी उठाव केला नसता तर सत्ता आली नसती असा रोखठोक दावाही बच्चू कडूंनी केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवत बच्चू कडू म्हणाले “देवेंद्र फडणीस दिल्लीला जाणार बावनकुळे मुख्यमंत्री त्यांच्याकडे आलेल्या भविष्यकार कोणत्या पार्टीमधून येतं ते तपासला पाहिजे.”
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“केंद्रात देवेंद्र फडणवीस जाऊ शकतात. तर महाराष्ट्रात चंद्रशेखर बावनकुळे पाहायाला मिळू शकतात. तुम्हाला वाटू शकतं की मी आणखी कोणाचं नाव घेईन. परंतु जे चित्र दिसतंय, त्यानुसार विदर्भातील भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी योग्य नेते दिसताहेत. ते सर्वांशी योग्य संवाद साधून सांभाळून घेणारे नेते आहेत. परंतु एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत.”





