Sharad Pawar : कर्जमाफीतील अटी रद्द होताच शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; नातवाचं केलं भरभरून कौतुक म्हणाले…
Sharad Pawar : या ट्वीटमध्ये त्यांनी सरकारने जाचक अटी रद्द केल्याबद्दल सरकारचे आभार मानले असून नातू रोहित पवार यांंचं देखील अभिनंदन केलं आहे.

Sharad Pawar : राज्य सरकारची महत्वाकांशी महात्मा फुले कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी होणार याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. सरकारने ३० जूनची दिलेली डेडलाइन हुकली असून, कर्जमाफीविषयी मतमतांतरे पाहायला मिळत आहे.
या योजनेलाचा लाभ घेण्यासाठी घातलेल्या जाचक अटीवरून विरोधकांनी सरकावर हल्लाबोल करत संबंधित अटी रद्द करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील आंदोलनाचे हत्यार उपसले होते.
नुकताच पावसाळी अधिवेशनाचा समारोप झाला. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेबाबत एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक्सवरुन ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी सरकारने जाचक अटी रद्द केल्याबद्दल सरकारचे आभार मानले असून नातू रोहित पवार यांंचं देखील अभिनंदन केलं आहे.
शरद पवारांचं ट्वीट
“सततच्या नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती परंतु सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने २०१९ कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन २०२५-२६ ,२०२६-२७ चे पिककर्ज भरण्याची घातलेली अट यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता.” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : Dhamal 4 Box Office : एक दोन नव्हे तर 29 चित्रपटांना धोबीपछाड! पहिल्याच दिवशी धमाल 4 ची बंपर कमाई
रोहित पवारांचं केलं अभिनंदन
राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत आज शासनाने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार. या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना त्यांचे नेते, राजकिय पक्ष त्यांचे नेते तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आ. रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन!
सततच्या नैसर्गिक आपत्ती ,शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती परंतु सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने २०१९ कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या…
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 10, 2026
काय घोषणा केली?
महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार होता, तो आता २ लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. तर प्रोत्साहनपर अनुदानासाठीची २०२६-२७ चं पीक कर्ज भरण्याची अट रद्द करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होणार याविषयी त्यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही.
हेही वाचा : Heavy Rain : अतिवृष्टीमुळे शेतशिवार जलमय; भातरोपे कुजण्याच्या मार्गावर






