PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी आणि पवारांच्या खासदारांच्या भेटीमागे काय होते कारण? बैठकीमध्ये केली महत्त्वाची मागणी
PM Narendra Modi : खासदारांनी मांडलेल्या सर्व समस्यांवर योग्य ती पावले उचलण्याचे मोदींचे आश्वासन

PM Narendra Modi : दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी भेट घेतली. या खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं. मात्र या भेटीवरुन अनेक प्रश्न निर्माण केले जात होते. काही दिवसांपूर्व स्वत: शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान मोदी यांची भेट घेतली होती.
जंतर-मंतरवरचे आंदोलन सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतलेली भेटराजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरली होती. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आठही खासदार काही वेळापूर्वीच मोदींना भेटले. जवळपास अर्धा तास ही बैठक झाली, यादरम्यान कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याबाबतची माहिती आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व खासदार भेटीसाठी पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुप्रिया सुळे यांच्याकडे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारणा केली. त्यानंतर शरद पवार यांच्या एनर्जीचा सर्वांनी आदर्श घेतला पाहिजे, अशा शब्दात मोदींनी कौतुक केलं. त्यानंतर सर्व खासदारांनी पंतप्रधान मोदींकडे मतदारसंघातील प्रश्न मांडले.
….भारतरत्न देण्याची मागणी
या बैठकीमध्ये राष्ट्रवादीकडून महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे. महापुरुषांच्या सन्मानासोबतच राज्यातील सध्याच्या बिकट परिस्थितीवरही या बैठकीत विस्तृत चर्चा झाली. 
महाराष्ट्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेले मोठे नुकसान, शेतीपिकांचे भाव आणि राज्यातील विविध विकास प्रकल्पांचे रखडलेले प्रश्न खासदारांनी पंतप्रधानांसमोर मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीच्या सर्व खासदारांचे म्हणणे अतिशय गांभीर्याने ऐकून घेतले आणि मांडलेल्या सर्व समस्यांवर योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
अन् चर्चांना उधाण
दुसरीकडे, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाविषयी एनडीएमध्ये विलीन होण्याची चर्चा रंगली आहे. काल मुख्यमंत्री फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा मुंबई ते कोल्हापूरपर्यंत एकत्र विमानातून प्रवास झाला होता, यावरूनही अधिक तर्क-वितर्क लावले जात आहे.
दरम्यान, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा एकदा नव्याने आणण्याची तयारी भाजपकडून केली जातं आहे. यासाठी गेल्या काही महिन्यांपासून फोडाफोडी सुरू असताना यात शरद पवारांचे खासदार असल्याच्या चर्चांनी चांगलाच जोर धरला होता.
हेही वाचा :
Sunil Tatkare : …तर सुनील तटकरे अद्याप प्रदेशाध्यक्षपदावर कार्यरत कसे? थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार





