Laxman Rejected Coaching : “मी २०२३ मध्येच हेड कोच बनणार होतो, पण …”; व्हीव्हीएस लक्ष्मणचा मोठा खुलासा; ‘त्या’ बैठकीचे रहस्य उघड
Laxman Rejected Coaching : व्हीव्हीएस लक्ष्मणने खुलासा केला आहे की, २०२३ मध्ये तो भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होणार होता, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्याने ही जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला.

VVS Laxman Reveals Rejecting Team India Head Coach Offer in 2023 : भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज फलंदाज आणि सध्या बंगळुरू येथील ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’चे (CoE) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांनी आपल्या कारकिर्दीतील एका अत्यंत मोठ्या गुपिताचा खुलासा केला आहे. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतरच ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक (Head Coach) बनणार होते, परंतु वैयक्तिक कारणांमुळे त्यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता, अशी माहिती खुद्द लक्ष्मण यांनी दिली आहे. रविवारी सीओईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला.
जय शाहंशी दोनदा भेट अन् द्रविडचा कार्यकाळ वाढला!
लक्ष्मण यांनी सांगितले, “२०२३ मध्ये मला मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी मिळणार होती. परंतु, वैयक्तिक कारणांमुळे मी हे पद स्वीकारू शकलो नाही. मी बीसीसीआयचे तत्कालीन सचिव जय शाह यांची दोनदा भेट घेतली आणि त्यांनी माझी कारणं समजून घेतली.” लक्ष्मण यांच्या नकारानंतर राहुल द्रविड यांचा कार्यकाळ वाढवण्यात आला, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने २०२४ चा टी-२० विश्वचषक जिंकला. २०२४ मध्ये द्रविड यांच्यानंतर गौतम गंभीर यांची प्रशिक्षकपदी निवड झाली.
मुख्य निवडकर्ता बनणार का? लक्ष्मण यांनी स्पष्टच सांगितले!
VIDEO | The BCCI Centre of Excellence chief VVS Laxman on Sunday said the hunt for a suitable candidate to fill the role of Head of Sports Science and Medicine at the facility is still on despite Nitin Patel quitting the post almost 18 months ago.
In this interim, Dhananjay… pic.twitter.com/WhiFofyNbX
— Press Trust of India (@PTI_News) August 9, 2026
सध्या मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या जागी लक्ष्मण यांची वर्णी लागणार अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र, लक्ष्मण यांनी यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, त्यांनी बीसीसीआयच्या ‘सेंटर ऑफ एक्सीलन्स’मधील आपला कार्यकाळ आणखी दोन वर्षांसाठी वाढवला आहे. लक्ष्मण म्हणाले, “जय शाह आणि विद्यमान सचिव देवजीत सैकिया यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. त्यामुळे मी पुढील २ वर्षे सीओईमध्येच राहून भारतीय क्रिकेटची पायाभूत रचना मजबूत करणार आहे. मुख्य प्रशिक्षक किंवा निवड समितीत जाण्याचा सध्या माझा कोणताही विचार नाही.”
भारतीय संघ आता श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी भारताला पुढील नऊ कसोटी सामन्यांपैकी किमान सहा सामने जिंकावेच लागतील. त्यामुळे, १५ ऑगस्टपासून गॉलमध्ये सुरू होणारा सामना भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल.





