विश्व हिंदू परिषदेची मागणी चर्चेत,”दोन पत्नी अन् दोनपेक्षा जास्त अपत्ये असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नका”

लाडकी बहीण योजनेला राज्यात भरात एकूणच चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ मार्फत महिलांना १५०० रुपये मिळणार आहे. अशातच या योजनेवरून राज्यभरात राज्याच्या राजकारणात अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहे.
अशातच राज्य सरकारसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अंमलबजावणी संदर्भात मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी एक मागणी केली आहे. प्रकाश महाजन म्हणाले,’राज्य सरकारने दोन बायका किंवा दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्या महिलांना विशेषत: मुस्लीम महिलांना या योजनेचा फायदा देऊ नये.’अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली आहे.
तर विश्व हिंदू परिषदेचे मुंबई-गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी देखील या योजनेवरून मागणी केली आहे. ज्यांना दोन पत्नी आणि दोनपेक्षा जास्त अपत्ये आहेत त्यांना ‘लाडकी बहीण योजनेचा लाभ देऊ नये, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे मुंबई-गोवा प्रदेश प्रमुख गोविंद शेंडे यांनी केली आहे. नागपुरात ते शनिवारी माध्यम प्रतिनिधींशी बोलत असताना त्यांनी ही मागणी केली आहे.
दरम्यान, शेंडे यांच्या या मागणीमुळे आता राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे. आता राज्य सरकार काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





