Union Budget 2026 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाचा उल्लेख ऐतिहासिक म्हणून केला. अर्थसंकल्पात १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब उमटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळचा अर्थसंकल्प अगणित संधींचा महामार्ग आहे. तो वर्तमानातील स्वप्नं साकार करणारा आहे. तसेच, देशाच्या उज्ज्वल भविष्याचा पाया आणखी मजबूत करणारा आहे. वर्ष २०४७ पर्यंत विकसित भारत बनवण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी अर्थसंकल्पाने मजबूत आधार दिला आहे. ही बातमी वाचा : Union Budget 2026 : “भारताच्या खऱ्या संकटांकडे दुर्लक्ष…”; राहुल गांधींचा खोचक टोला आपला देश सुधारणा एक्स्प्रेसवर स्वार झाला आहे. त्या एक्स्प्रेसला नवी ऊर्जा, नवी गती मिळेल. केवळ वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनण्यावर नागरिक संतुष्ट नाहीत. देशाने लवकरात लवकर जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनावे असा नागरिकांचा संकल्प आहे. Union Budget 2026 ते विचारात घेऊन महत्वाकांक्षी अर्थसंकल्पातून भविष्याचा वेध घेण्यात आला आहे. विकासावर फोकस ठेवतानाच आर्थिक तूट कमी ठेवण्यावर, महागाई नियंत्रित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, उच्च भांडवली खर्चाचीही निश्चिती करण्यात आली आहे, असे म्हणत मोदींनी अर्थसंकल्पाची प्रशंसा केली. अर्थसंकल्पात महिला शक्तीचे मजबूत प्रतिबिंब दिसते. अधिकाधिक लाभ युवकांना, लघू आणि मध्यम उद्योगांना मिळावा या उद्देशातून महत्वाची पाऊले उचलली गेली आहेत. मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत उपक्रमांना आणखी गती मिळावी यासाठी महत्वाकांक्षी आराखडा सादर करण्यात आला आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाचा विचार अर्थसंकल्पातून करण्यात आला आहे. शहरांच्या विकासावर विशेष ध्यान देण्यात आले आहे. त्याशिवाय, संवेदनशील अर्थसंकल्प गाव, गरीब आणि शेतकऱ्याचे कल्याण करणारा आहे, अशी ग्वाही मोदींनी दिली. हे देखील वाचा : Union Budget 2026 : “भारताच्या खऱ्या संकटांकडे दुर्लक्ष…”; राहुल गांधींचा खोचक टोला