Sanjay Raut : गद्दारांना गद्दारच म्हटले पाहिजे.! संजय राऊत यांचे एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर
शिदेंसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Sanjay Raut | Eknath Shinde – शिदेंसेनेचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत धमकावल्यानंतर त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सध्या धमक्या, खून, हत्या, खंडणी यांना ऊत आला असून, त्याला सरकारचे संरक्षण आहे.
पत्रकारांना जर धमकी मिळत असेल आणि राज्याचे मुख्यमंत्री हसत हसत ते उडवून देत असतील तर ते गंभीर असल्याचे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत म्हणाले, काही वर्षांपूर्वी ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे आणि शिवसेनेमध्ये वाद झाला होता. त्यावेळी आम्ही काय त्यांना ठार मारण्याची धमकी दिली नव्हती.
पण त्यावेळी देशभरातील पत्रकार शिवसेना भवन समोर आले होते, पत्रकारांवर हल्ला झाला म्हणून कारवाईची मागणी त्यांनी केली होती. आता ते पत्रकार कुठे गेले? पत्रकार हा या देशाच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, पण केंद्रातले मोदी आणि अमित शाह मानत नाहीत.
पत्रकारांना दिलेल्या धमकीबाबत मुंबई पोलिसांनी, गृहमंत्र्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता कारवाई केली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
कॅमेरासमोर बाँब टाकण्याची भाषा केली जाते. स्मशानात पाठवण्याची धमकी दिली जाते. हे राज्य कलंकित होत आहे, बदनाम होत आहे. आमचा महाराष्ट्र असा नव्हता, असे राऊत यांनी म्हटले.
संजय राऊत यांच्यावरही शिवीगाळ केल्याचा आरोप शिंदेंसेनेकडून सातत्याने केला जातो. त्यावर बोलताना राऊत म्हणाले की, मी जर शिवी दिली असेल तर दाखवा.
एखाद्याला शिवी देणे आणि एखाद्याला हत्येची धमकी देणे, यामधील फरक उपमुख्यमंत्र्यांना समजत नसेल तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे राऊत म्हणाले.





