imran khan death। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याभोवती सुरू असलेल्या अफवांमध्ये, एक नवीन अपडेट समोर आला आहे. पाकच्या खासगी वृत्तवाहिनीनुसार, आदियाला तुरुंग प्रशासनाने बुधवारी पीटीआय संस्थापकांना तुरुंगाबाहेर हलवण्यात आल्याच्या अफवांचे खंडन केले. तुरुंग प्रशासनाने आग्रह धरला की ते तुरुंगातच आहेत आणि त्यांची प्रकृती चांगली आहे. तुरुंग अधिकारी काय म्हणाले ? imran khan death। रावळपिंडी तुरुंग अधिकाऱ्यांनी एका निवेदनात, “अदियाला तुरुंगातून त्यांच्या बदलीच्या वृत्तात काहीही तथ्य नाही. ते पूर्णपणे निरोगी आहेत आणि त्यांना पूर्ण वैद्यकीय सेवा मिळत आहे.” असे म्हटले आहे. तुरुंग अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या वृतांना निराधार ठरवत स्पष्ट केले की, इम्रान खान यांची काळजी घेतली जात आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दावा केला की, इम्रान खान यांना तुरुंगात “फाइव्ह स्टार” सुविधा मिळत आहेत. एप्रिल २०२२ मध्ये अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेवरून काढून टाकल्यानंतर ते ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी याविषयी बोलताना, “इमरान खान यांना तुरुंगात अशा सुविधा मिळत आहेत ज्या त्यांना कोठडीत असतानाही मिळाल्या नव्हत्या. त्यांना देण्यात येणाऱ्या जेवणाच्या मेनूची तपासणी करा; ते पंचतारांकित हॉटेलमध्येही उपलब्ध नाही.”असेही त्यांनी म्हटले आहे. आसिफ यांनी दावा केला की पीटीआय संस्थापकांना टेलिव्हिजनची सुविधा आहे आणि ते त्यांच्या आवडीचे कोणतेही चॅनेल पाहू शकतात. त्यांच्याकडे व्यायामाची मशीन देखील आहेत. तुरुंगाची तुलना आणि वैयक्तिक अनुभव imran khan death। त्यांच्या तुरुंगवासाच्या परिस्थितीची तुलना स्वतःच्या परिस्थितीशी करताना, आसिफ म्हणाले, “आम्ही थंड जमिनीवर झोपलो, तुरुंगातील जेवण खाल्ले आणि जानेवारीमध्ये आमच्याकडे फक्त दोन ब्लँकेट होते आणि गरम पाणी नव्हते.” त्यांनी आठवण करून दिली की तत्कालीन अधीक्षक असद वॉरैच यांनी त्यांच्या कोठडीतून गीझर काढून टाकण्याची वैयक्तिकरित्या खात्री केली. मंत्र्यांनी असाही दावा केला की इम्रान खान यांना डबल बेड आणि मखमली गादी देण्यात आली होती. त्यांनी तुरुंगातील लाऊडस्पीकरवर वॉशिंग्टन अरेना येथील त्यांचे भाषण ऐकले पाहिजे. इमरान खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचारापासून ते दहशतवादापर्यंत अनेक खटले आहेत. एप्रिल २०२२ मध्ये विरोधी पक्षाच्या अविश्वास ठरावाद्वारे त्यांना सत्तेवरून काढून टाकण्यात आल्यापासून हे खटले सुरू आहेत.