Imran Khan mocks Pakistan’s cricket team : आशिया कप 2025 मध्ये भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानला दोन सामन्यांत चांगलाच धूळ चारली आहे. या पराभवांमुळे पाकिस्तानी संघाचा सोशल मीडियावर आणि सर्वत्र जोरदार खिल्ली उडवली जात आहे. यातच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इम्रान खान यांनीही संघावर खोचक टिप्पणी करत पीसीबी प्रमुख मोहसिन नकवी आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर निशाणा साधला आहे. भारताचा पाकिस्तानवर दमदार विजय – आशिया कप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात दोन सामने झाले. पहिला सामना 14 सप्टेंबरला लीग टप्प्यात झाला, ज्यात भारताने 7 गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर 21 सप्टेंबरला सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारताने पाकिस्तानला 6 गडी राखून एकतर्फी पराभूत केले. ऑपरेशन सिंदूरनंतर प्रथमच दोन्ही संघ आमनेसामने आले होते. इम्रान खान यांची खोचक टिप्पणी – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी याबाबत खोचक टिप्पणी केली आहे. त्यांची बहिण अलीमा खान यांनी सांगितले की, इम्रान यांनी सुचवले आहे की, जर लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पीसीबी प्रमुख मोहसिन नक्वी हे सलामीवीर म्हणून खेळले, तरच पाकिस्तान भारताला हरवू शकेल. हेही वाचा – Kieron Pollard : पोलार्ड तात्याचा वर्ल्ड रेकॉर्ड! टी-२० क्रिकेटमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू इतकेच नव्हे, तर इम्रान यांनी पुढे म्हटले की, सामन्याचे पंच म्हणून माजी सरन्यायाधीश काजी फैज ईसा आणि मुख्य निवडणूक आयुक्त सिकंदर सुल्तान राजा यांना नेमावे, तर तिसरे पंच म्हणून इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर्फराज डोगर असावेत. या टिप्पणीमागे इम्रान यांनी आपल्या तुरुंगवासाला जबाबदार ठरवणाऱ्या व्यक्तींवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आहे. हेही वाचा – IND vs PAK : पाकिस्तानचा पुन्हा एकदा रडीचा डाव! भारताविरुद्धच्या पराभवानंतर ICC कडे केली ‘ही’ तक्रार इम्रान खान 2023 पासून तुरुंगात – इम्रान खान यांच्या बहिणीने सांगितले की, त्यांनी पाकिस्तानी संघाच्या सातत्यपूर्ण पराभवांबाबत भाईशी चर्चा केली होती, तेव्हा त्यांनी अशी टिप्पणी केली. इमरान 1992 मध्ये पाकिस्तानला विश्वचषक जिंकवणारे कर्णधार होते. मात्र, 2023 पासून ते तुरुंगात आहेत आणि त्यांच्या पीटीआय पक्षाचे संस्थापकही आहेत.