Sharad Pawar : “युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर..”; मविआच्या बैठकीत शरद पवारांकडून चिंता व्यक्त, पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी म्हणाले…
Sharad Pawar : अमेरिका, इस्राइल विरुद्ध इराण यांच्यातील युद्धाच्या परिस्थितीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य करताना चिंता व्यक्त केली आहे.

Sharad Pawar : गेल्या चार आठवड्यांपासून अमेरिका इस्राइल विरुद्ध इराण यांच्यातील संघर्ष अद्याप थांबलेला नाही. आखातात भडकलेल्या युद्धाची झळ जगभरातील देशांना बसत आहे. मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागत आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. या युद्धाचा परिणाम आशियामध्ये भारतीय चलनावर होत आहे. युद्धामुळे परिस्थिती भीषण बनली आहे. Sharad Pawar
या युद्धाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीत शरद पवार यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना चिंता व्यक्त केली आहे. युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर आणखी चित्र वेगळं असू शकतं, परिणामी टंचाई अधिक तीव्र होऊ शकते, अशी चिंता शरद पवारांनी व्यक्त केली आहे. Sharad Pawar
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धावर केलेल्या वक्तव्यावरून देखील शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केले आहे. एवढ्या दिवस युद्ध सुरु असताना भारतात त्याची झळ बसत आहे. मात्र यावर पंतप्रधानांनी उशीरा भाष्य करणं ही योग्य बाब नाही, अशा शब्दांत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar : “युद्धाची अशीच परिस्थिती राहिली तर मविआच्या बैठकीत शरद पवारांकडून चिंता व्यक्त
या बैठकीत राज्यसभेवर शरद पवार यांची महाविकास आघाडीकडून संधी दिल्याने त्यांनी महाविकास आघाडीचे आभार मानले. दुसरीकडे, महाविकास आघाडी पुष्पगुच्छप्रमाणे अशीच टवटवीत राहो, अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
राजकारण, समाजकारण पवार साहेबांनी त्या त्या ठिकाणी ठेवलं. बाळासाहेब आणि पवारसाहेब चांगले मित्र होते. दोघेही केव्हा सुडबुद्धीने वागले नाहीत. स्टेजवर पवार साहेबांनी राजकारण केलं, खाली आल्यावर त्यांनी त्यांचे संबंध ठेवले. असेही उद्धव ठाकरे म्हणाले.





