Top 10 News : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार, ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल आणि कलाकाराच्या गुणांपेक्षा त्यांचे फॉलोवर्स महत्वाचे..वाचा टॉप १० बातम्या
Top 10 News : राज्यात काही भागांत पावसाने उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

Top 10 News : राज्यातील ११ जिल्ह्यांत २४ तास मुसळधार;
विजांच्या कडकडाटासह धुमाकूळ घालणार पाऊस
Top 10 News : राज्यात काही भागांत पावसाने उसंत घेतली असली तरी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट तसेच अकोला, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. सध्या राजस्थान परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र आणि विविध हवामान प्रणाली सक्रिय असल्याने राज्यात पाऊस-ऊनाचा खेळ सुरू आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, विशेषतः घाटमाथा आणि विदर्भातील भागांत प्रवास व वादळी हवामानादरम्यान आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ठाकरेंच्या विश्वासू शिलेदारावर गुन्हा दाखल (Top 10 News)
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सोलापूरच्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य आणि अपशब्द वापरल्याचा आरोप भाजपचे स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम 356(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, सदाभाऊ खोत यांनीही संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत राजकीय वातावरण आणखी तापवले आहे.
मुंबईत सगळ्यात मोठा SRA घोटाळा;
4 जणांवर गुन्हा दाखल (Top 10 News)
मुंबईतील एसआरए पुनर्विकास प्रकल्पातील कथित घोटाळ्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचे तत्कालीन पीए आणि उबाठाचे माजी आमदार संजय पोतनीस यांचे माजी पीए विश्वनाथ जाधव याच्यासह अन्य तिघांवर 47 जणांची सुमारे 5.57 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. प्रकल्पग्रस्तांसाठीच्या सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवत बनावट ताबा पत्रे, कथित सरकारी शिक्के आणि बनावट कागदपत्रांचा वापर करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आर्थिक व्यवहार आणि संबंधित कागदपत्रांची चौकशी केली जात आहे.
राज्यातील तब्बल 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र (Top 10 News)
अधिकृत माहिती जाहीर

राज्यातील तब्बल 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र (Top 10 News) अधिकृत माहिती जाहीर
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत राज्य सरकारने महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे राज्यातील तब्बल 66 लाख महिलांना लाभार्थी यादीतून वगळण्यात आले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, सध्या 1 कोटी 66 लाख महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत. महिला व बालविकास विभागाने पात्र लाभार्थींच्या खात्यात जून महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. ई-केवायसी यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या महिलांनाच योजनेचा नियमित लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे.
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी
सातही तलावांमध्ये मुबलक पाणीसाठा Top 10 News :
मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांमधील पाणीसाठा 89 टक्क्यांहून अधिक झाला असून तो पुढील 267 दिवसांसाठी पुरेसा असल्याचे महापालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. जूनमध्ये कमी पावसामुळे निर्माण झालेली चिंता जुलैमधील मुसळधार पावसाने दूर केली आहे. विहार, तुळशी, तानसा आणि मोडकसागर हे चार तलाव आधीच भरले आहेत, तर उर्वरित धरणांतील जलसाठाही झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, सध्या लागू असलेली 10 टक्के पाणी कपात येत्या दोन ते तीन दिवसांत मागे घेण्याबाबत महापालिका निर्णय घेण्याची शक्यता आहे.
फास्ट ट्रॅक कोर्टाच्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली,
आता न्यायमूर्ती अजय गुप्ता करणार पेपरफुटीची सुनावणी
नीट-यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. दिल्लीतील ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश अनु ग्रोव्हर बलिगा यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या बदलीनंतर आता न्यायमूर्ती अजय गुप्ता हे नीट पेपरफुटी प्रकरणासह इतर संबंधित खटल्यांची सुनावणी करणार आहेत. विशेष म्हणजे, ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालये स्थापन होण्यापूर्वीही हेच प्रकरण न्यायमूर्ती अजय गुप्ता यांच्याकडे होते. त्यामुळे नीट प्रकरणाची सुनावणी पुन्हा त्यांच्या न्यायालयात सुरू होणार आहे. (Top 10 News)
“वादाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारा,”
धीरेंद्र कृष्ण शास्त्रीचा GENZ ला संदेश
कटनी दौऱ्यावर असताना बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी जंतर-मंतरवरील आंदोलनाबाबत प्रतिक्रिया दिली. विरोध करणे हा प्रत्येकाचा लोकशाही अधिकार असला तरी कोणाच्याही आई किंवा कुटुंबाबाबत अपशब्द वापरणे भारतीय संस्कृतीला धरून नसल्याचे त्यांनी म्हटले. “वादाऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारा,” असे आवाहन त्यांनी विशेषतः तरुणांना केले. सभ्य भाषा, संस्कार आणि सामाजिक मर्यादा पाळण्याचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी सावन आणि कांवड यात्रेदरम्यानही श्रद्धा राखताना इतरांच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेण्याचा संदेश दिला.
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने तेलाचे दर 6% घसरले;
इराण युद्धाचा धोका टळला!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील प्रस्तावित लष्करी हल्ला ऐनवेळी स्थगित करून वाटाघाटींना संधी दिल्याने जागतिक तेल बाजारात मोठी घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूडच्या किमती सुमारे 6 टक्क्यांनी घसरून 82.41 डॉलर, तर डब्ल्यूटीआय क्रूड 79.40 डॉलर प्रति बॅरलवर आले. ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीतील वाहतूक पूर्ववत करणे आणि इराणचा अणुकार्यक्रम थांबवणे या दोन प्रमुख अटी मांडल्या आहेत. सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात असून, चर्चेला यश न आल्यास लष्करी पर्याय खुले असल्याचा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
महिला आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर!
विरोधकांना धडकी भरवणारा 15 धुरंधरांचा Squad
महिला आशिया कप 2026 साठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधारपदाची धुरा पुन्हा हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. मागील संघात केवळ एकच बदल करण्यात आला आहे. दुखापतग्रस्त श्रेयंका पाटीलच्या जागी लेगस्पिन अष्टपैलू प्रेमा रावतला कायम ठेवण्यात आले आहे. लॉर्ड्स कसोटीत शतक झळकावूनही यष्टिरक्षक फलंदाज यास्तिका भाटियाला टी-20 संघात स्थान मिळालेले नाही. तिच्याऐवजी युवा यष्टिरक्षक जी कमालिनीवर निवडकर्त्यांनी पुन्हा विश्वास दाखवला आहे. स्मृती मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा आणि ऋचा घोष सध्या इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ स्पर्धेत सहभागी आहेत.
कलाकाराच्या गुणांपेक्षा त्यांचे फॉलोवर्स महत्वाचे..
अभिनेता सचिन देशपांडेचा मोठा दावा Top 10 News :
मराठी मनोरंजन विश्वातील कास्टिंग प्रक्रियेबाबत अभिनेता सचिन देशपांडे यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. ‘होणार सून मी ह्या घरची’ फेम अभिनेत्याने एका मुलाखतीत सांगितले की, एका लोकप्रिय वाहिनीच्या मालिकेसाठी त्यांची निवड जवळपास निश्चित झाली होती. मात्र नंतर इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या पाहून त्यांच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्याला संधी देण्यात आली. “आजकाल कलाकाराची गुणवत्ता नव्हे, तर सोशल मीडियावरील फॉलोअर्स महत्त्वाचे ठरत आहेत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर मराठी मनोरंजन क्षेत्रातील कास्टिंग पद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.





